नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

वरोरा शहराला नवीन जिल्हा बनवण्याची आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा शहराला नवीन जिल्हा बनवण्याची आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराला नवनिर्मित जिल्ह्याचे मुख्यालय बनवण्याची मागणी स्थानिक आमदार करण संजय देवतळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

आमदार देवतळे यांनी मंत्री बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व भद्रावती, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव व झरी जामणी तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर या तालुक्यांचा समावेश असलेला स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा, अशी विनंती केली आहे. या सर्व तालुक्यांसाठी वरोरा हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती व सर्वात सोयीचे ठिकाण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
वरोरा शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक असून जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये येथे पूर्ण होत असल्याचे आमदार देवतळे यांनी सांगितले. जिल्हा कार्यालयासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन व इमारती उपलब्ध असून फारसा खर्च न करता कमी वेळात प्रशासकीय यंत्रणा उभारता येईल, असेही त्यांनी नमूद केले. वरोरा शहराला जागतिक कीर्तीचे आनंदवन व ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांसारखे वैशिष्ट्य लाभले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

प्रशासकीय सोयीसाठी व प्रस्तावित तालुक्यांतील नागरिकांच्या सोईसाठी हा नवीन जिल्हा अत्यंत आवश्यक असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments