वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा शहराला नवीन जिल्हा बनवण्याची आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा शहराला नवीन जिल्हा बनवण्याची आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराला नवनिर्मित जिल्ह्याचे मुख्यालय बनवण्याची मागणी स्थानिक आमदार करण संजय देवतळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

आमदार देवतळे यांनी मंत्री बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व भद्रावती, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव व झरी जामणी तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर या तालुक्यांचा समावेश असलेला स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा, अशी विनंती केली आहे. या सर्व तालुक्यांसाठी वरोरा हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती व सर्वात सोयीचे ठिकाण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
वरोरा शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक असून जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये येथे पूर्ण होत असल्याचे आमदार देवतळे यांनी सांगितले. जिल्हा कार्यालयासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन व इमारती उपलब्ध असून फारसा खर्च न करता कमी वेळात प्रशासकीय यंत्रणा उभारता येईल, असेही त्यांनी नमूद केले. वरोरा शहराला जागतिक कीर्तीचे आनंदवन व ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांसारखे वैशिष्ट्य लाभले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

प्रशासकीय सोयीसाठी व प्रस्तावित तालुक्यांतील नागरिकांच्या सोईसाठी हा नवीन जिल्हा अत्यंत आवश्यक असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments