प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

शिवबाण घेऊन गेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, 17 जण जखमी

त्रिशूल घेऊन गेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, 17 जण जखमी

वरोरा (ता. वरोरा) : एका मालवाहतूक वाहनाने भटाळा येथे शिवबाण (त्रिशूल) घेऊन दर्शन करून परतणाऱ्या भाविकांचा एक गट राळेगाव येथे जात असताना त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी झाले तर 5 किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना रविवारी दिनांक 15 ला सकाळच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटाळा परिसरातील नागरिकांचा एक समूह महाशिवरात्रीनिमित्त भटाळा येथील प्राचीन महादेव मंदिरात शिवबाण घेऊन दर्शनासाठी गेला होता. दर्शन संपवून परतताना हे सर्वजण पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात होते. यावेळी एम.एच. ३४ बी.झेड. ९४७८ क्रमांकाचे अशोक लेलँड कंपनीचे मालवाहक वाहन चालक रामा पांडुरंग जाधव यांच्या ताब्यात होते. राळेगाव परिसरात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन पलटी झाले.
अपघात इतका जबर होता की वाहनातील प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या अपघातात भुषण विजय दोडके (वय १७, रा. पाटाळा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले व सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने १२ जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मयूर वनशिंगे (वय १६), राजू किसन शिवरकर (वय ४२), राजू जाधव (वय ४०), मंथन डाहूले (वय १३), लकी भडके (वय २०), नानाजी मरस्कोल्हे (वय ७०), गणेश खापणे (वय ४०), मारोती र (वय ४५), विनोद गौरकर (वय ५०), रोशन माडवे (वय १७), मारोती (वय ५०) आणि सोहम भोयर (वय १६) यांचा समावेश आहे. यापैकी काहींची नावे पूर्ण न मिळाल्याने त्यांचा तपशील प्रलंबित आहे.

उल्लेखनीय म्हणजे, वरोरा तालुक्यातील भटाळा गावातील हे महादेवाचे मंदिर प्राचीन असून महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. मृत भुषण दोडके याच्यासह इतरही काही भाविक महादेवासाठी शिवबाण (त्रिशूल) घेऊन मंदिरात गेले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments