वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा


मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा
चंद्रपूर / भद्रावती, ता. १४ मार्च: मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे वृत्त समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ढोरवाचा-पिपरी डांबरी रस्त्याचे काम प्रशासनाने जोरात सुरू केले आहे. मात्र, या घडामोडीमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे काम अचानक सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ढोरवाचा ते पिपरी दरम्यानचा हा रस्ता गेली पंधरा वर्षे प्रचंड जीर्णावस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत तसेच ग्रामस्थांनी स्वतःहून संबंधित विभागाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने  त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलाचा तलाव बनत असे आणि नागरिकांची प्रचंड कुचंबणा व्हायची.

राज्याचे मुख्यमंत्री १४ रोजी (शनिवारी) या परिसरात येऊन या रस्त्याचे उद्घाटन करणार असल्याचे समजताच प्रशासकीय यंत्रणा अचानक सक्रिय झाली. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर डांबरीकरणाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी मशिनरी कामाला लागली आहे. हे पाहून एका स्थानिक युवकाने कंत्राटदारासमोर जाऊन सवाल केला, "आत्तापर्यंत इथे माणसं राहत नव्हती का? आम्ही पंधरा वर्षे या रस्त्याने कसं जगलो, याचं कुणाला काही देणंघेणं नव्हतं?"

स्थानिक युवकांनी या कामाच्या दर्जावर देखील तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी काम उरकण्याच्या निक्षून सूचना असल्याने कंत्राटदाराने दर्जाला तिलांजली दिली आहे. कामगारांकडून घाईघाईत डांबर टाकले जात असून त्यामुळे काही दिवसांतच हा रस्ता पुन्हा खराब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. निकृष्ट बांधकामाबद्दल प्रश्न विचारला असता, कंत्राटदाराने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता थेट पळ काढला.

ग्रामस्थांची मागणी आहे की, केवळ उद्घाटनासाठी नव्हे, तर ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेता दर्जेदार रस्ता बांधून द्यावा. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून कामाची पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक युवक संघटनेने केली आहे.
......................

Comments