वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

वरोरातील लोकशिक्षण संस्थेत दोन दिवसीय वाचक संमेलन व ग्रंथ मेळाव्याचे आयोजन

वरोरातील लोकशिक्षण संस्थेत दोन दिवसीय वाचक संमेलन व ग्रंथ मेळाव्याचे आयोजन

वरोरा : लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'असे वाचक घडलो आम्ही' या उपक्रमाची वाटचाल पुढे नेत संस्थेच्या परिसरात दोन दिवसीय वाचक संमेलन आणि ग्रंथ मेळाव्याचे आयोजन २१ व २२ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. वाचन संस्कृतीच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी २१ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित राहणार आहेत. कविवर्य इंद्रजीत भालेराव (परभणी) प्रमुख अतिथी म्हणून तर प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री स्वागताध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विजय प्रकाशन, लाखे प्रकाशन आणि पिंपळापुरे प्रकाशनाचे प्रतिनिधी यावेळी मनोगत व्यक्त करतील.

सायंकाळी ५ वाजता वाचन चळवळ उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त भीमाबाई जोंधळे (आजीचे पुस्तकांचे हॉटेल, नाशिक), अक्षर आनंद उपक्रमाचे विनोद शेंडगे (परभणी) आणि 'रीडिंग किडा' या बालवाचक घडविणाऱ्या उपक्रमाच्या प्रणेत्या डॉ. पल्लवी बापट (नागपूर) यांच्या मुलाखती होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता प्रा. श्रीकांत पाटील 'आवडलेल्या कथा कथाकारांच्या शब्दात' हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता 'वाचकाने लिहिते होताना' या सत्रात डॉ. माधुरी मानवटकर व प्रसिद्ध नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी आपला लेखन प्रवास कथन करतील. सकाळी १०.३० वाजता 'मैफल कवितांची' या कार्यक्रमात इंद्रजीत भालेराव आपल्या कवितांची मेजवानी सादर करतील.

या संमेलनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशकांची पुस्तक विक्री केंद्रे उपलब्ध राहणार असून वाचक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांनी केले. पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ऍड. दुष्यंत देशपांडे, प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री, प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय अंबुलकर, स्मिता धोपटे आदी उपस्थित होते.

Comments