खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, दिनांक ११/३/२०२६: राज्यातील खाजगी शाळांकडून पालकांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. शाळांच्या आवारातच पुस्तके, वह्या व गणवेश यांच्या विक्रीतून सुरू असलेल्या नफेखोरीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. वरोरा येथील सेंट ॲन्स पब्लिक स्कूलवर अलीकडेच कारवाई करण्यात आले होती.  राज्यातील बहुतांश खाजगी शाळांनी शिक्षणाचा पवित्र व्यवसाय बाजूला ठेवून व्यावसायिक नफेखोरीचा मार्ग अवलंबला आहे. शाळेच्या आवारातच पुस्तके, वह्या आणि गणवेशाची विक्री सक्तीची केली जाते. विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांना केली जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: · प...

वरोरा तालुक्यात अवैध दारू व्यवसाय आणि रेती तस्करीचा बंदोबस्त नाही, प्रहार जनशक्ती पक्षाची धमकी – ‘जेलभरो आंदोलन’ करणार

वरोरा तालुक्यात अवैध दारू व्यवसाय आणि रेती तस्करीचा बंदोबस्त नाही, प्रहार जनशक्ती पक्षाची धमकी – ‘जेलभरो आंदोलन’ करणार

वरोरा, ८ जानेवारी २०२२: प्रहार जनशक्ती पक्षाच्या वरोरा शाखेने उपविभागीय अधिकारी व पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अवैध दारू विक्री आणि रेती तस्करी प्रकरणी गंभीर तक्रार नोंदवून, आठ दिवसात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिलांना घेऊन ‘जेलभरो आंदोलन’ करण्याची धमकी दिली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते किशोर डुकरे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री खुल्या डोळ्यांपुढे चालू आहे. या व्यवसायाला पोलिस बिट कर्मचाऱ्यांची चालना मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे ग्रामीण भागात गुंडगिरी वाढत आहे असेही निवेदनात नमूद केले आहे.

रेती तस्करीबाबतच्या तक्रारीत म्हटले आहे की, वर्धा नदीवरील लिलाव झालेल्या रेती घाटावरून पोकल्यांड मशीनद्वारे अवैध रेती उपसणे सुरू आहे. शिवाय, गावातील नाल्यांतील सर्व रेती स्थानिक तस्करांनी पूर्णपणे उपसली आहे, असेही आरोप केले आहेत. या अवैध कारवाइंविरुद्ध पोलिस व महसूल विभाग उदासीन आहेत, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पक्षाने सांगितले आहे की, जर या प्रकरणी आठ दिवसांच्या आत गुन्हे दाखल करून कारवाई केली नाही, तर तालुक्यातील हजारो महिलांच्या पाठिंब्याने जेलभरो आंदोलन सुरू केले जाईल. अधिकारी यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी ही कारवाई अखेरचा पर्याय म्हणून उरला आहे, असे डुकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Comments