वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

वरोरा तालुक्यात अवैध दारू व्यवसाय आणि रेती तस्करीचा बंदोबस्त नाही, प्रहार जनशक्ती पक्षाची धमकी – ‘जेलभरो आंदोलन’ करणार

वरोरा तालुक्यात अवैध दारू व्यवसाय आणि रेती तस्करीचा बंदोबस्त नाही, प्रहार जनशक्ती पक्षाची धमकी – ‘जेलभरो आंदोलन’ करणार

वरोरा, ८ जानेवारी २०२२: प्रहार जनशक्ती पक्षाच्या वरोरा शाखेने उपविभागीय अधिकारी व पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अवैध दारू विक्री आणि रेती तस्करी प्रकरणी गंभीर तक्रार नोंदवून, आठ दिवसात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिलांना घेऊन ‘जेलभरो आंदोलन’ करण्याची धमकी दिली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते किशोर डुकरे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री खुल्या डोळ्यांपुढे चालू आहे. या व्यवसायाला पोलिस बिट कर्मचाऱ्यांची चालना मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे ग्रामीण भागात गुंडगिरी वाढत आहे असेही निवेदनात नमूद केले आहे.

रेती तस्करीबाबतच्या तक्रारीत म्हटले आहे की, वर्धा नदीवरील लिलाव झालेल्या रेती घाटावरून पोकल्यांड मशीनद्वारे अवैध रेती उपसणे सुरू आहे. शिवाय, गावातील नाल्यांतील सर्व रेती स्थानिक तस्करांनी पूर्णपणे उपसली आहे, असेही आरोप केले आहेत. या अवैध कारवाइंविरुद्ध पोलिस व महसूल विभाग उदासीन आहेत, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पक्षाने सांगितले आहे की, जर या प्रकरणी आठ दिवसांच्या आत गुन्हे दाखल करून कारवाई केली नाही, तर तालुक्यातील हजारो महिलांच्या पाठिंब्याने जेलभरो आंदोलन सुरू केले जाईल. अधिकारी यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी ही कारवाई अखेरचा पर्याय म्हणून उरला आहे, असे डुकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Comments