खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, दिनांक ११/३/२०२६: राज्यातील खाजगी शाळांकडून पालकांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. शाळांच्या आवारातच पुस्तके, वह्या व गणवेश यांच्या विक्रीतून सुरू असलेल्या नफेखोरीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. वरोरा येथील सेंट ॲन्स पब्लिक स्कूलवर अलीकडेच कारवाई करण्यात आले होती.  राज्यातील बहुतांश खाजगी शाळांनी शिक्षणाचा पवित्र व्यवसाय बाजूला ठेवून व्यावसायिक नफेखोरीचा मार्ग अवलंबला आहे. शाळेच्या आवारातच पुस्तके, वह्या आणि गणवेशाची विक्री सक्तीची केली जाते. विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांना केली जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: · प...

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य समारंभ; नवनगराध्यक्ष अर्चना ठाकरे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व आमदार करण देवतळे यांची उपस्थिती

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य समारंभ; नवनगराध्यक्ष अर्चना ठाकरे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व आमदार करण देवतळे यांची उपस्थिती

वरोरा 06/01/2026

: वरोरा तालुका माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भव्य मिरवणूक, वरोरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम करण्यात आला.

कार्यक्रमाचे औचित्य साधून नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व शिक्षणप्रसाराच्या कार्याला वंदन केले. त्यांनी म्हटले, "सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रम, त्याग आणि संघर्षामुळेच आज माझ्यासारख्या सामान्य महिलेला नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. त्यांनी महिलांना शिक्षण, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा मार्ग दाखवला." त्यांच्या भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे महत्त्वही रेखाटले.

कार्यक्रमास माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. संमेलनाच्या अध्यक्षपदी सौ. जयश्रीताई सातोकार होत्या. यावेळी आमदार करण देवतळे, श्री. दामूभाऊ धावडे, श्री. विलास नेरकर तसेच ॲड. श्रीकांत नागरीकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

माळी समाज सेवा मंडळाने आयोजित केलेला हा सोहळा सामाजिक जागृती व शैक्षणिक प्रेरणा देणारा ठरला.

Comments