कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू. दोन्हीही मुलांचे शव पाण्याबाहेर काढण्यात यश. चंद्रपूर रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न.

वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू. 
दोन्हीही मुलांचे शव पाण्याबाहेर काढण्यात यश. 

चंद्रपूर रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न.

वरोरा 3/11/2025
चेतन लूतडे 

वरोरा : वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या अपघातात दोन मुलांना वाचवण्यात यश आले होते. 
मात्र दोन मुले पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला.

             मृतक प्रणय विनोद भोयर, वरोरा 

रविवारी दुपारी वरोरा येथील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय १३ वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५ वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी वरोरा शहरातून सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने तिथे पोहत असताना चारही मित्र बुडू लागले.
            मृतक रुपेश विजेंद्र खूळसंगे 

या संकटाचा आवाज ऐकल्यावर जवळच असलेल्या एका गुराख्याने त्वरित पाण्यात उडी मारून बचावकार्य सुरू केले. 
गुराख्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना यशस्वीरित्या किनाऱ्यावर काढले. मात्र रुपेश ला काडी चा आधार देण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याला गुराख्याची काडी पकडता आली नाही. आणि प्रणय नदीच्या धारेवर असल्याने दूर वाहत गेला होता. 
ही दुर्देवी घटना तिथे असलेले प्रत्यक्ष दर्शनी त्यांचे दोन मित्र व चराई करणार्या व्यक्तीने सांगितले होते. 

या घटनेनंतर चंद्रपूर रेस्क्यू टीमने आपले प्रयत्न सुरू केले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत वर्धा नदीपत्रात मुलांचे शव मिळाले नाही. यानंतर आज सोमवारला सकाळी पुन्हा प्रयत्न सुरू केले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन्ही शव पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. 
या मुलांचे शव शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले. 



Comments