नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू चां संशय, दोघे वाचले

वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू चां संशय, दोघे वाचले

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा : वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन मुलांना वाचवण्यात यश आले तर दोन मुलांना बचावण्यास अयशस्वी ठरले.
              प्रणय विनोद भोयर, वरोरा 

रविवारी दुपारी वरोरा येथील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय १३ वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५ वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी वरोरा शहरातून सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने तिथे पोहत असताना चारही मित्र बुडू लागले.

या संकटाचा आवाज ऐकल्यावर जवळच असलेल्या एका गुराख्याने त्वरित बचावकार्य सुरू केले. 
गुराख्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना यशस्वीरित्या किनाऱ्यावर काढले. मात्र, दुर्दैवाने रुपेश आणि प्रणय ही दोन मुले खोल पाण्यात वाहून गेली आणि त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलीस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मृत मुलांच्या शवांचा शोध घेण्यासाठी शोधकार्य सुरू आहे.

या अकाली मृत्यूमुळे मुलांच्या कुटुंबीयांवर तसेच मित्र-नातेवाईकांवर कोसळलेल्या शोकाकुल संसर्गाने सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Comments