नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

रानतळोधी येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न

रानतळोधी येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न 

 वरोरा 
       तालुक्यातील रानतळोधी( नवीन) येथे  ओज बहुउद्देशीय संस्था वरोरा,वेद संस्था वरोरा व हेल्पेज इंडिया,वरलक्ष्मी फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 या शिबिराचे उद्घाटन वेध संस्थेचे कार्यकर्ता विलास माटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नं. रानतळोधी गावच्या सरपंच काजोल मडावी, उपसरपंच कैलास कुमरे  व ग्रा. सदस्य श्री. मंगलदास आत्राम  ओज संस्थेचे सचिव आशिष रॊकडे, हेल्पेज इंडिया संयोजिका राशेदा शेख , डॉ. शेख इत्यादी उपस्थित होते. 
 हेल्पेज इंडिया व वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा द्वारा गावातील  58 लोकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. रानतळोधी गाव हे 98 टक्के आदिवासी असून या गावाला आरोग्य सेवा मिळत नाही. गावाचे पुनर्वसन झाले असून शासकीय सुविधा पासून गाव वंचित आहे.  बी.पी.,शुगर,सर्दी,ताप,खोकला इत्यादी आजारावर उपचार करण्यात आले. याकरिता डॉक्टर शेख व राशीदा शेख व त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले. 
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच,सदस्य व गावातील बचत युवक महीला गटांनी सहकार्य केले आहे. असे रमेश चौधरी यांनी कळविले.

Comments