नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

*वरोरा येथे भव्य गणपती विसर्जन; विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिरच्या मानाच्या गणपतीची गांधीसागर तलावावर विसर्जन.

*वरोरा येथे भव्य गणपती विसर्जन; विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिरच्या मानाच्या गणपतीची गांधीसागर तलावावर विसर्जन.

वरोरा गणपती विसर्जनाला सुरुवात. 

चेतन लूतडे 

वरोरा: वरोरा शहरामध्ये गणपती विसर्जनास सुरुवात झाली असून यावर्षीही भक्तिभावाने आणि उत्साहातून बाप्पांना निरोप दिला जात आहे. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर गणपतीचे विसर्जन गांधीसागर तलावात करण्यात आले.

या विसर्जनसमारंभाला शहरातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते उपस्थित होते. मंडळाच्या सर्व सदस्यांनी आणि भाविक भक्तांनी गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा-अर्चना केली आणि आनंदातून तसेच थोड्याशा निराशेने बाप्पाला निरोप दिला. विसर्जनाची मिरवणूक भव्य आणि दिव्य स्वरूपात पाहायला मिळाली. भाविक ढोल, ताशाच्या गजरात नाचत-गातत बाप्पाला विसर्जनासाठी नेत होते.
गणपतीची आरती मोठ्या हर्ष उल्हसात म्हणत गणेशाला शेवटचा निरोप देत. "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या". चा घोषणामध्ये परिसर दुमदुमून गेला .


या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. शिवाय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांनी आपापले पेंडॉल उभारून गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे तसेच यात सहभागी होणाऱ्या नेत्यांचे स्वागत केले. शहरात एकात्मतेचे आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले.

Comments