वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

संविधान रक्षणासाठी निर्णायक लढा, नागपूरच्या भूमीतून उठला संघर्षाचा बिगुल!

संविधान रक्षणासाठी निर्णायक लढा, नागपूरच्या भूमीतून उठला संघर्षाचा बिगुल!

नागपूर 
आज नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने "संविधान सत्याग्रह" पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधींचे पणतू श्री. तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक दीक्षाभूमी येथून झाला. संविधानाचे रक्षण, देशातील एकता, बंधुता आणि शांततेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देश असून, या पदयात्रेचा समारोप २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे होणार आहे.
राज्य तसेच देशभरात संविधानावर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू असताना संविधानाच्या संरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ आता आली असल्याचा ठाम संदेश या पदयात्रेतून देण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या पवित्र संविधानाची प्रत संघाला प्रदान करण्यात येईल.

या ऐतिहासिक पदयात्रेत मी आज प्रत्यक्ष उपस्थित राहून संविधान रक्षणाच्या या लढ्यात माझा ठाम सहभाग नोंदवला आणि देशातील लोकशाही मूल्यांचे जतन व संविधानाची अखंडता राखण्यासाठी एकजुटीचा संकल्प केला. यावेळी माझ्यासह सुनिल केदार, खा. श्यामकुमार बर्वे, आ. अभिजीत वंजारी, मा.आ. सुभाष धोटे, श्रीमती सुषमाताई अंधारे यांसह काँग्रेसचे अनेक मान्यवर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.


Comments