प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

भद्रावतीत नागपंचमीची भव्य यात्रा, भाविकांची गर्दी

 भद्रावतीत नागपंचमीची भव्य यात्रा, भाविकांची गर्दी  

रवि बघेल भद्रावती
२९ जुलै, २०२५  

भद्रावती येथे नागपंचमी निमित्त भाविकांची गर्दी

रवि बघेल भद्रावती
29/07/2025

भद्रावती शहरात नागपंचमी निमित्त नाग मंदिर येथे भव्य यात्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यासाठी महाराष्ट्रा राज्यासह  मध्य प्रदेश तेलंगाणातून भावीक दर्शनासाठी येत असतात. भद्रावती तालुक्याच्या ग्राम दैवत म्हणजे भद्रनाग. अतिशय छोटं आणि सुबक असलेल्या या मंदिराला आणि इथल्या भद्र नागाच्या मूर्तीला लोकांमध्ये मोठं श्रद्धेचे स्थान आहे. हे मंदिर किमान एक हजार वर्षे जुनं असल्याचे पुरातत्त्व दाखले आहेत. सध्या अस्तित्वात असलेला हे मंदिर ११४६ साली बांधण्यात आलं.११४६साली भद्रनाग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला शिलालेख या ठिकाणी आजही आहे.हे संपूर्ण भद्रनाग मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आला आहे. मंदिराचा आकार छोटा असला तरी हेमाडपंथी शैलीची सगळी वैशिष्ट्ये या मंदिरात आहे.
 मंदिराला भक्कम असे ३६ खांब आहेत. आणि ९ फणयांची शेषनागाची सुमारे अडीच फूट उंचीची मूर्ती आहे.मंदिरात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटते . भद्रनाग मंदिरात नागपंचमीची जोरदार यात्रा भरवण्याची जय्यत तयारी केली आहे. भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असणारा आहे. मंदिर परिसरात भाविकांनी स्वच्छ्ता राखण्यास मदत  करण्याची विनंती संस्थेने केली आहे. यासोबतच मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भद्रावती पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



Comments