महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक– मा. आमदार करण संजय देवतळे

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक – मा. आमदार करण संजय देवतळे महाराष्ट्र राज्याचा सन 2026–27 चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाला गती देणारा, दूरदृष्टीचा व लोककल्याणाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. करण संजय देवतळे यांनी व्यक्त केली  या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकरी, महिला, युवक, कामगार, तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्यात आला असून राज्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शेती व शेतकरी यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली असून  कर्ज माफी समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे.  महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व रोजगा...

पत्रकार मनोज गाठले यांचे निधन


पत्रकार मनोज गाठले यांचे निधन

वरोरा : वरोरा तालुक्यातील चारगाव (धरण) बू. येथील रहिवासी मनोज अशोक गाठले (४० वर्ष) यांचे दि. २४ जुन ला पहाटे चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात आजराशी झुंज देत निधन झाले.

मनोज गाठले हे आपल्या खुप वर्षांपासून पत्रकारितेतून समाजिक कार्याला हातभार लावणारे आणि न्याय मिळवून देणारे, विदर्भ प्रतिष्ठानचे संपादक होते. या पूर्वी दैनिक पब्लिक पोस्ट या वृत्तपत्राचे शेगाव प्रतिनिधी म्हणून काम केले तर सध्या दैनिक पुण्य-नगरीचे शेगाव प्रतिनिधी होते. तसेच व्हाईस ऑफ मिडीयाचे सदस्य होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन मुली असा आप्तपरिवार आहे. यांच्या वर काल दुपारी ५ वाजता चारगाव बू. येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला.


व्हॉइस ऑफ मेडिया पत्रकार संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Comments