प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

दीक्षा भूमी चंद्रपूर येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

दीक्षा भूमी चंद्रपूर येथे  बुद्ध जयंती उत्साहात साजरी

चंद्रपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर संचालित डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने अत्यंत उत्साहात आणि श्रद्धाभावाने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान. अरुण घोटेकर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहणाने झाली, त्यानंतर दीक्षा भूमी येथे वंदना घेऊन कार्यक्रमाची धम्ममय सुरुवात केली.
मुख्य कार्यक्रम दीक्षा भूमी परिसरातील आंबेडकर भवनात पार पडला. यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव मान. कुणाल घोटेकर होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी बुद्ध, धम्म व संघ हे त्रिसरण संपूर्ण विश्वाला शांती, अहिंसा व मानवतेचा संदेश देणारे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "बुद्धांचा धम्म हा केवळ धर्म नसून मानवतेचा मूलमंत्र आहे." कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष मान. अशोक घोटेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मानवमुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे तथागत बुद्धांच्या शिकवणींवर चालणे. त्यांच्या विचारांशिवाय समाजाचा खरा विकास शक्य नाही." या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित डॉ. स्निग्धा सदाफळे  यांनी 'बुद्ध म्हणजेच भारतीय इतिहासातील लोकशाही, समता आणि स्वातंत्र्याचा अग्निस्त्रोत' असल्याचे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर यांनी बुद्धांच्या विचारांचे आजच्या युगातील महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी धम्मतत्त्वांच्या आधारे जीवन घडवावे, असे आवाहन केले.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शितल रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शिल्पा  सदाफाळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला होता.

Comments