प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

17 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण वरोरा येथील आबा मक्ता येथील शेतकऱ्याला केले भूमीहीन.

17 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण 

वरोरा येथील आबा मक्ता येथील शेतकऱ्याला केले भूमीहीन.

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील आबा मक्ता या गावांमध्ये गेल्या 40 वर्षापासून वन हक्काच्या अतिक्रमित जागेवर शेती करीत असलेल्या शेतकऱ्याला भूमिहीन करण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा परिवार उघड्यावर पडला असून गेल्या 17 दिवसापासून आमरन उपोषणासाठी शेतकरी आपल्या शेतात बसले आहे. 

सर्वे क्रमांक 83 मध्ये विद्युत विभागाचे १३ kv सब स्टेशन बनणार असून यासाठी ग्रामपंचायतीने साठ आर जमीनचा ठराव मंजूर करून विद्युत विभागाच्या ताब्यात दिली आहे. केल्या कित्येक वर्षापासून शेतकरी याच जागेवरती आपली शेती करीत होता. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे. 

मात्र आता प्रशासनाने आपला प्रस्ताव बदलला असून शेतकऱ्याची ही जमीन नाही ती  सर्वे नंबर 92 मध्ये आहे. असा चुकीचा प्रस्ताव केला आहे. पण या वन हक्क अतिक्रमित जागेवरती दुसराच शेती वाहत आहे.

८३ आर मध्ये दोन हेक्टर शेती वरती शेतकरी विकास बाळकृष्ण खोब्रागडे हे गेल्या 40 वर्षापासून शेती करीत आहेत. मात्र कराची पावती भरत असताना 92 सर्वे नंबर  वरती टॅक्स देऊन  चुकीची पावती भरण्यात आली होती. शेतकऱ्याला हाच सर्वे नंबर 92 आहे असा समज दिला होता. शेतकरी शिक्षित नसल्याने या बाबीचा उलगडा झाला नव्हता. मात्र आता सरकारने विद्युत विभागातर्फे नवीन सबस्टेशन बनविण्यासाठी सर्वे नंबर 83 मधील जागा देऊन या शेतकऱ्याला भूमीहीन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

ही बाब माहिती होताच भीम आर्मी व भारत एकता मिशन चंद्रपूर यांनी शेतकऱ्याला पाठिंबा दर्शवित वरोरा येथे पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण जमीन मोजावी. व उर्वरित जमीन वाहण्यासाठी देण्यात यावी. या पद्धतीची मागणी करण्यात आली आहे. 
मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नसून शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करणे सुरू आहे. गावातील सरपंचांनी सुद्धा या बाबीची दखल न घेतल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतातच उपोषण सुरू केले आहे. 
लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाला याबाबत  बरेच निवेदन दिले असून अजून पर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.
त्यामुळे भीम आर्मी आणि भारत एकता मिशन चे अतुल पाटील तालुका संघटक, भाग्यश्री पवार, उपेंद्र ढोक  यांनी शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून भूमीन केलेल्या शेतकऱ्याला जोपर्यंत योग्य न
न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा लढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.



Comments