महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक– मा. आमदार करण संजय देवतळे

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक – मा. आमदार करण संजय देवतळे महाराष्ट्र राज्याचा सन 2026–27 चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाला गती देणारा, दूरदृष्टीचा व लोककल्याणाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. करण संजय देवतळे यांनी व्यक्त केली  या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकरी, महिला, युवक, कामगार, तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्यात आला असून राज्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शेती व शेतकरी यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली असून  कर्ज माफी समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे.  महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व रोजगा...

17 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण वरोरा येथील आबा मक्ता येथील शेतकऱ्याला केले भूमीहीन.

17 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण 

वरोरा येथील आबा मक्ता येथील शेतकऱ्याला केले भूमीहीन.

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील आबा मक्ता या गावांमध्ये गेल्या 40 वर्षापासून वन हक्काच्या अतिक्रमित जागेवर शेती करीत असलेल्या शेतकऱ्याला भूमिहीन करण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा परिवार उघड्यावर पडला असून गेल्या 17 दिवसापासून आमरन उपोषणासाठी शेतकरी आपल्या शेतात बसले आहे. 

सर्वे क्रमांक 83 मध्ये विद्युत विभागाचे १३ kv सब स्टेशन बनणार असून यासाठी ग्रामपंचायतीने साठ आर जमीनचा ठराव मंजूर करून विद्युत विभागाच्या ताब्यात दिली आहे. केल्या कित्येक वर्षापासून शेतकरी याच जागेवरती आपली शेती करीत होता. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे. 

मात्र आता प्रशासनाने आपला प्रस्ताव बदलला असून शेतकऱ्याची ही जमीन नाही ती  सर्वे नंबर 92 मध्ये आहे. असा चुकीचा प्रस्ताव केला आहे. पण या वन हक्क अतिक्रमित जागेवरती दुसराच शेती वाहत आहे.

८३ आर मध्ये दोन हेक्टर शेती वरती शेतकरी विकास बाळकृष्ण खोब्रागडे हे गेल्या 40 वर्षापासून शेती करीत आहेत. मात्र कराची पावती भरत असताना 92 सर्वे नंबर  वरती टॅक्स देऊन  चुकीची पावती भरण्यात आली होती. शेतकऱ्याला हाच सर्वे नंबर 92 आहे असा समज दिला होता. शेतकरी शिक्षित नसल्याने या बाबीचा उलगडा झाला नव्हता. मात्र आता सरकारने विद्युत विभागातर्फे नवीन सबस्टेशन बनविण्यासाठी सर्वे नंबर 83 मधील जागा देऊन या शेतकऱ्याला भूमीहीन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

ही बाब माहिती होताच भीम आर्मी व भारत एकता मिशन चंद्रपूर यांनी शेतकऱ्याला पाठिंबा दर्शवित वरोरा येथे पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण जमीन मोजावी. व उर्वरित जमीन वाहण्यासाठी देण्यात यावी. या पद्धतीची मागणी करण्यात आली आहे. 
मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नसून शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करणे सुरू आहे. गावातील सरपंचांनी सुद्धा या बाबीची दखल न घेतल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतातच उपोषण सुरू केले आहे. 
लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाला याबाबत  बरेच निवेदन दिले असून अजून पर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.
त्यामुळे भीम आर्मी आणि भारत एकता मिशन चे अतुल पाटील तालुका संघटक, भाग्यश्री पवार, उपेंद्र ढोक  यांनी शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून भूमीन केलेल्या शेतकऱ्याला जोपर्यंत योग्य न
न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा लढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.



Comments