वरोरा वाळूघाट हत्याकांड: १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी, पोलिसांवर हल्ल्याचा आरोप

वरोरा वाळूघाट हत्याकांड: १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी,  पोलिसांवर हल्ल्याचा आरोप. महसूल विभागाचे कमालीचे दुर्लक्ष, महसूल मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज.  वरोरा (10/3/2026) : वर्धा नदीच्या बामर्डा वाळूघाटावर  भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व १२ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत (एमसीआर) पाठवले आहे. यापैकी चार आरोपींनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एक मार्च रोजी वाळू घाटावर थकबाकीच्या वादातून झालेल्या हिंसक हल्ल्यात भरत नागपाल यांचा मृत्यू झाला होता.  वाळू व्यवसायिक पंकज वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ जणांविरुद्ध भादंविच्या विविध कलमांसह गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल रामचंद्र कामडी, सौरभ दिलीपसिंग ठाकूर, अक्षय विजयराव खडसे, उदय भास्कर वांदिले, अतुल पुरुषोत्तम मोटघरे, सुनील नारायण ढोरे, प्रफुल्ल सूर्यभान उमाटे, नितीन यशवंत कामडी, अजय उर्फ गोलू दिपसिंग इरपाचे, प्रकाश शंकर कासारे, प्रविण कवडुजी व...

जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद* *अंधारी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी*

*जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद*
 *अंधारी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी*

चंद्रपूर, दि. 5 मार्च : राज्य शासनाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी आश्रमशाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली.
तसेच मौजा पाहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पाहामी गावात जाऊन गावातील नागरीकांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला. 
जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले. यावेळी कोळसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादी, पोलीस पाटील भिमराव सोयाम, अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.
००००००

Comments