चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत .

चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेल्या   पहिल्या महिला जिल्हाधिकारी  वसुमना पंत . बातमी: चेतन लूतडे २/४/२६ चंद्रपूर दि. २ – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या फेरबदल केले आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. (भाप्रसे) यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या जागी राहणार असून, स्वामी यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करण्यात आले आहे. त्याचबरोबर, विनय गौडा यांच्या जागी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार, विनय गौडा यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरचा कार्यभार दिलीप स्वामी यांच्याकडून स्वीकारावा, तर चंद्रपूरचा कार्यभार वसुमना पंत यांच्याकडे सोपवावा. बदली झाल्यानंतर कार्यभार हस्तांतरणाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाला सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी मंजुरी दिली आहे. वसुमना पंत यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम क...

जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद* *अंधारी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी*

*जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद*
 *अंधारी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी*

चंद्रपूर, दि. 5 मार्च : राज्य शासनाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी आश्रमशाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली.
तसेच मौजा पाहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पाहामी गावात जाऊन गावातील नागरीकांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला. 
जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले. यावेळी कोळसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादी, पोलीस पाटील भिमराव सोयाम, अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.
००००००

Comments