मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

: मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मध्यमवर्गीय (एमआयजी) गृहकर्जदारांना देय असलेली ₹ २.५० लाखांची ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी’ तात्काळ वितरित करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे जोरदारपणे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आवासन व शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांना एक पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित सबसिडीबाबत लक्ष वेधले आहे. खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, २०१७ ते २०२१ या कालावधीत बँकांकडून गृहकर्ज घेतलेल्या अनेक पात्र मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत अपेक्षित सबसिडी मिळालेली नाही. ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, अनेक वर्षे उलटूनही ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने कर्जदारांवर २.५० लाख रुपयांच्या अतिरिक्त मुद्दलाचा तसेच त्यावर वाढत असलेल्या व्याजाचा मोठा आर्थिक बोजा पडत आहे. यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्...

विज द्या अन्यथा व्याज द्या - खासदार प्रतिभा धानोरकरमागणी मान्य न झाल्यास महावितरण अधिकाऱ्यांना घालणार घेराव.

विज द्या अन्यथा व्याज द्या - खासदार प्रतिभा धानोरकर
मागणी मान्य न झाल्यास महावितरण अधिकाऱ्यांना घालणार घेराव.

वरोरा 
फक्त बातमी 

खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याच्या प्रश्नावर त्या आक्रमक झाल्या असून विज द्या अथवा 2018 पासून जमा केलेल्या सुरक्षा रकमेवर व्याज द्या अन्यथा महावितरण च्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर ह्या नागरीकांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असून सध्या त्यांनी 2018 पासून जिल्ह्यातील 1590 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विज मिळवून देण्याकरीता सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सदर शेतकऱ्यांनी वीज जोडणी करीता सुरक्षा ठेव देखील जमा केलेली आहे. या विषयासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र लिहून शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. उशीर झाल्यास सामान्य नागरीकांकडून विज बिलावर व्याज घेणारे महावितरण 2018 पासून शेतकऱ्यांना विज जोडणी देण

Comments