प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*गेल्या 35 वर्षापासून वरोडा वासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष*

*गेल्या 35 वर्षापासून वरोडा वासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष*
 वरोडा : शाम ठेंगडी 

      वरोडा रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जवळपास ३५ वर्षांपासून रेल्वे प्रवासी मंडळ,  रेल्वे प्रवासी संघ झटत आहे. विविध संघटनेतर्फे वेळोवेळी विविध मागण्यांचे प्रस्ताव जनप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पाठवून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली गेली. मागील तीन दशकांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेससह अन्य गाड्यांच्या थांब्याची मागणी अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही. उलट ज्या गाड्या सुरू होत्या त्या सुद्धा बंद करण्यात आल्या. विशेष म्हणजे राज्यातील विविध रेल्वे स्थानकावर मागणी नसूनही थांबा व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, सन 1877 मध्ये टर्मिनल असलेले वरोडा रेल्वेस्थानक याला अपवाद ठरले आहे. हा दैवदुर्विलास आहे. पुढेही वरोडा स्थानकावर गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासन मंजूर करेल असे चिन्ह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या बोलण्यातून दिसत नाही. कारण जो पर्यंत नवीन रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत वरोडा तसेच जिल्ह्यातील जनतेला प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येते. याचाच दुसरा अर्थ असा निघू शकतो की, " न नौ मन तेल होगा, न राधा नाचेगी ". अशी प्रतिक्रिया वरोडा-भद्रावती-चंद्रपूर प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली.
  20 फरवरी 2025 ला साडेसात वाजता, कॉटन मार्केट ग्राउंड ,नवीन नगर परिषद समोर वरोरा  

                              

Comments