मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

: मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मध्यमवर्गीय (एमआयजी) गृहकर्जदारांना देय असलेली ₹ २.५० लाखांची ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी’ तात्काळ वितरित करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे जोरदारपणे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आवासन व शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांना एक पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित सबसिडीबाबत लक्ष वेधले आहे. खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, २०१७ ते २०२१ या कालावधीत बँकांकडून गृहकर्ज घेतलेल्या अनेक पात्र मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत अपेक्षित सबसिडी मिळालेली नाही. ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, अनेक वर्षे उलटूनही ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने कर्जदारांवर २.५० लाख रुपयांच्या अतिरिक्त मुद्दलाचा तसेच त्यावर वाढत असलेल्या व्याजाचा मोठा आर्थिक बोजा पडत आहे. यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्...

*गेल्या 35 वर्षापासून वरोडा वासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष*

*गेल्या 35 वर्षापासून वरोडा वासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष*
 वरोडा : शाम ठेंगडी 

      वरोडा रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जवळपास ३५ वर्षांपासून रेल्वे प्रवासी मंडळ,  रेल्वे प्रवासी संघ झटत आहे. विविध संघटनेतर्फे वेळोवेळी विविध मागण्यांचे प्रस्ताव जनप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पाठवून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली गेली. मागील तीन दशकांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेससह अन्य गाड्यांच्या थांब्याची मागणी अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही. उलट ज्या गाड्या सुरू होत्या त्या सुद्धा बंद करण्यात आल्या. विशेष म्हणजे राज्यातील विविध रेल्वे स्थानकावर मागणी नसूनही थांबा व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, सन 1877 मध्ये टर्मिनल असलेले वरोडा रेल्वेस्थानक याला अपवाद ठरले आहे. हा दैवदुर्विलास आहे. पुढेही वरोडा स्थानकावर गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासन मंजूर करेल असे चिन्ह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या बोलण्यातून दिसत नाही. कारण जो पर्यंत नवीन रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत वरोडा तसेच जिल्ह्यातील जनतेला प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येते. याचाच दुसरा अर्थ असा निघू शकतो की, " न नौ मन तेल होगा, न राधा नाचेगी ". अशी प्रतिक्रिया वरोडा-भद्रावती-चंद्रपूर प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली.
  20 फरवरी 2025 ला साडेसात वाजता, कॉटन मार्केट ग्राउंड ,नवीन नगर परिषद समोर वरोरा  

                              

Comments