नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

*आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू**Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

*आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू*

*Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

चंद्रपूर, दि. 24 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, विना अनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) आणि महानगरपालिका शाळेमध्ये (स्वयंअर्थसहाय्यीत) आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.  प्रवेश प्रक्रियेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 185 पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. नोंदणी पूर्ण झालेल्या 185 शाळांतील 1527 रिक्त जागांकरीता ऑनलाईन अर्ज 27 जानेवारी 2025 पर्यंत मागविण्यात येत आहे.

इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी. तसेच 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी. प्रवेश प्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यावर संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.

पालकांनी ऑनलाईन अर्ज भरतांना घरचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदी अचूक माहिती भरावी. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अतंर्गत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. यापुर्वी प्रवेश मिळालेल्या बालकाची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.

Comments