कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशनचा उपक्रम: गांधी चौकात भारत-न्यूझीलंड टी-२० सामन्याचे लाईव्ह प्रसारण;

कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशनचा उपक्रम: गांधी चौकात भारत-न्यूझीलंड टी-२० सामन्याचे लाईव्ह प्रसारण;  Instagram reel for cricket lover वरोरा : वरोरा शहरातील सामाजिक संस्था कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशन तर्फे क्रिकेटप्रेमी आणि देशभक्तांच्या मनोरंजनासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. संस्थेने गांधी चौक येथे मोठ्या एलईडी स्क्रीन आणि दर्जेदार साऊंड सिस्टम लावून आयसीसी वर्ल्ड कप टी-ट्वेंटी सामन्याचे लाईव्ह प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे.  हा  विशेष कार्यक्रम रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यादिवशी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील थरारक सामना पाहण्यासाठी नागरिकांना संधी मिळणार आहे. एलईडी स्क्रीनवर लाईव्ह प्रसारणासाठी संध्याकाळी ७:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.  कल्पतरू युथ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमामागचा मुख्य उद्देश युवकांमध्ये क्रीडाभावना वाढवणे आणि भारतीय क्रिकेट संघाच्या माध्यमातून देशप्रेमाची भावना निर्माण करणे हा आहे. एकत्र येऊन सामना पाहिल्यास विजयाचा आनंद अनेक प...

*आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू**Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

*आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू*

*Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

चंद्रपूर, दि. 24 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, विना अनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) आणि महानगरपालिका शाळेमध्ये (स्वयंअर्थसहाय्यीत) आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.  प्रवेश प्रक्रियेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 185 पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. नोंदणी पूर्ण झालेल्या 185 शाळांतील 1527 रिक्त जागांकरीता ऑनलाईन अर्ज 27 जानेवारी 2025 पर्यंत मागविण्यात येत आहे.

इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी. तसेच 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी. प्रवेश प्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यावर संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.

पालकांनी ऑनलाईन अर्ज भरतांना घरचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदी अचूक माहिती भरावी. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अतंर्गत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. यापुर्वी प्रवेश मिळालेल्या बालकाची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.

Comments