*नगरपरिषद तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष निधी मंजूर!

*नगरपरिषद तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष निधी मंजूर!*  *आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; राजुरा शहराच्या वैभवात भर पडणार!* राजुरा, दि.15/3/2026 राजुरा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि शहराची प्रमुख ओळख असलेल्या नगरपरिषदेच्या समोरील 'माजी मालगुजारी तलावा'च्या पुनरुज्जीवनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत या तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या अविरत पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. निधीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेले तलावाचे काम आता पुन्हा जोमाने सुरू होणार असून राजुरा शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे. आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासूनच देवराव भोंगळे यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले होते. यापूर्वी या तलावाचे काम सुरू झाले होते, परंतु तांत्रिक अडचणी आणि निधीच्या कमतरतेमुळे ते बंद पडले. आवश्यक निधीचा प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित होता. यावर तोडगा काढण्...

आनंदवन बुधवार बाजारात वजन काटे माप अधिकाऱ्याचे दुर्लक्ष*भाजीपाल्याच्या दुकानदारांच्या काट्यांवर स्टीलच्या भांड्याचे वजन*

आनंदवन बुधवार बाजारात वजन काटे माप अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

भाजीपाल्याच्या दुकानदारांच्या काट्यांवर स्टीलच्या भांड्याचे वजन

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा शहरालगत आनंदवन येथे भाजीपाल्याचा दर बुधवार व रविवारी बाजार भरत असतो. या बाजारात हिंगणघाट येथील बहुतांश व्यापारी भाजीपाला घेऊन येतात. त्यांच्या या काट्यावर स्टीलचे जड भांडे ठेवल्याने वस्तू कमी येत आहे. याबद्दल ग्राहकाने शंख निर्माण केल्यास अपशब्द बोलून दुसरीकडे जा. कोणाला घेऊन यायचे तर घेऊन या. या शब्दात ग्राहकांना मानसिक ताण दिला जात आहे. 
वजन माफ काटे अधिकारी निद्रा अवस्थेत असून बहुतांश काटे तपासले सुद्धा नाहीत त्यामुळे भांड्यांच्या वजनासोबत वस्तू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे भाजीपाला कमी बसत असून सहसा गरीब वर्गातील लोकांना हे कळूनही येत नाही. 
शिक्षित व्यक्तींनी सांगितले असता "तुमच्याने  जे होते ते करून घ्या" अशे बिनधास्त वाक्य ऐकायला मिळतात. यावरून लक्षात येते की अधिकारी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. 
एका महिलेने अर्धा किलो वांगी घेतले होते. त्यामध्ये 0.17 स्टीलच्या वाट्याचे वजन घेऊन वांगी देण्यात आले. जेव्हा ग्राहकाच्या लक्षात आले तेव्हा लगेच वांगी हातातून हिसकून वांग्याचे टोपलीमध्ये फेकण्यात आले. याबाबत सावरा सावर करण्याचा दुकानदाराने प्रयत्न केला. यानंतर बरीच बाचाबाची झाली. असे अनेक प्रकार बुधवार व रविवार बाजारात होत असून याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही वाली नाही. येथील प्रशासन अशा दुकानदाराला आश्रय देत असून थोडस्या पैश्यासाठी गावाची प्रतिमा मलीन होत आहे.

मुळात या ठिकाणी बरेच मोबाईल व दुचाकी चोरीला जात आहे. 
हा सगळा प्रकार महिला वर्गात जास्त प्रमाणात होत असून सर्वसामान्य महिला हा अपमान सहन करून मुक्याट्याने घरी वापस येतात. हा सर्व प्रकार सर्रास सुरू होत असून यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही.

या ठिकाणी केमिकलने पिकवलेले फळे सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे या सर्वांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. एक्सपायरी संपलेले बंद वस्तू सुद्धा मोठ्या प्रमाणात विकायला येतात. मासाचे तुकडे अस्ताव्यस्त पडून असते. अजून पर्यंत एकही कारवाई पुढे आलेली नाही. त्यामुळे बरीच चर्चा ऐकायला मिळते.

या सर्व बाबीकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.


Comments