प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*समस्या निवारणासाठी भीम आर्मीचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन*

*समस्या निवारणासाठी भीम आर्मीचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                शहरातील सुमठाना भागातील रस्ते अत्यंत खराब झालेले असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. याच भागातील मनिहार लेआउट येथे रस्त्यावर वॉल कंपाऊंड बांधुन अतिक्रमण करण्यात आल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याशिवाय शहरात अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषदेने खराब झालेले रस्ते दुरुस्त करावे व याबरोबरच अन्य समस्या देखील मार्गी लावाव्या यासाठी भद्रावती तालुका भीम आर्मीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्याशी चर्चा करण्यात आली.निवेदन सादर करताना भिम आर्मीचे राजरतन पेटकर, अतुल पाटील, थॉमस दुधे,रोशन पेटकर, सुरज बाराहाते, संकेत चिमूरकर आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

Comments