नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

*समस्या निवारणासाठी भीम आर्मीचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन*

*समस्या निवारणासाठी भीम आर्मीचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                शहरातील सुमठाना भागातील रस्ते अत्यंत खराब झालेले असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. याच भागातील मनिहार लेआउट येथे रस्त्यावर वॉल कंपाऊंड बांधुन अतिक्रमण करण्यात आल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याशिवाय शहरात अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषदेने खराब झालेले रस्ते दुरुस्त करावे व याबरोबरच अन्य समस्या देखील मार्गी लावाव्या यासाठी भद्रावती तालुका भीम आर्मीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्याशी चर्चा करण्यात आली.निवेदन सादर करताना भिम आर्मीचे राजरतन पेटकर, अतुल पाटील, थॉमस दुधे,रोशन पेटकर, सुरज बाराहाते, संकेत चिमूरकर आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

Comments