प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी महाविकास आघाडी ची बैठक संपन्न

*राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी  महाविकास आघाडी ची बैठक संपन्न*  

फक्त बातमी 
चेतन लुतडे 

 दिनांक 13ऑक्टोबर रोजी राजुरा विधानसभा आमदार तथा राष्ट्रीय काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष भाऊ धोटे यांच्या  अध्यक्षतेखाली  राजुरा विधानसभा येथील महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्रजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस चे अरुणजी निमजे तसेच काँग्रेस पक्षाचे अरुणजी धोटे हे प्रमुख स्थानी होते. 
यावेळी तिन्ही पक्षाच्या वतीने येणारी राजुरा विधानसभा  ही सर्वांनी मिळून ताकतीने लढवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आनू असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी रवींद्र शिंदे यांचा आज वाढदिवस असल्याने तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांनी केक व पुष्पगुच्छ  देऊन  त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना-उबाठा पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करत विजयश्री खेचून आणायसाठी योग्य तो सन्मान ठेऊन आपसामध्ये चांगल समन्वय ठेऊन  मतदारंमध्ये महाविकास आघाडी ची भूमिका मांडण्या संदर्भात सूचना केल्या व पुढे तिन्ही पक्षाच्या समन्वय समिती च्या माध्यमातून निवडूक रणनीती ठरवून सामोरे जाण्याची भूमिका स्पष्ट केली.


Comments