टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या बकरी बाजार व आठवडी बाजाराचा 20 मार्च रोजी लिलाव.

टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या बकरी बाजार व आठवडी बाजाराचा 20 मार्च रोजी लिलाव. टेमुर्डा : येथील ग्रामपंचायत हद्दीतील बकरी बाजार व आठवडी बाजार (भाजीपाला व इतर) यांच्या आगामी २०२६-२७ या वर्षासाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. हा लिलाव मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १२६ अन्वये ग्रामपंचायत सभागृह, टेमुर्डा येथे दिनांक 20 मार्च २०२६, शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२६-२०२७ (दि. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७) या कालावधीसाठी हे बाजार ठेक्याने देण्यात येणार आहेत. लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुक ठेकेदारांना काही महत्त्वाच्या अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत. लिलाव प्रक्रिया व अनामत रक्कम : लिलावाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत इच्छुक बोलीदारांची अनामत रक्कम स्वीकारली जाईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता प्रथम बकरी बाजाराच्या लिलावास सुरुवात होईल. बकरी बाजार लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठवडी बाजार (भाजीपाला व इतर) यासाठी लिलाव घेण्यात येईल. लिलावात सहभागी होण्यासाठी बकर...

राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी महाविकास आघाडी ची बैठक संपन्न

*राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी  महाविकास आघाडी ची बैठक संपन्न*  

फक्त बातमी 
चेतन लुतडे 

 दिनांक 13ऑक्टोबर रोजी राजुरा विधानसभा आमदार तथा राष्ट्रीय काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष भाऊ धोटे यांच्या  अध्यक्षतेखाली  राजुरा विधानसभा येथील महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्रजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस चे अरुणजी निमजे तसेच काँग्रेस पक्षाचे अरुणजी धोटे हे प्रमुख स्थानी होते. 
यावेळी तिन्ही पक्षाच्या वतीने येणारी राजुरा विधानसभा  ही सर्वांनी मिळून ताकतीने लढवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आनू असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी रवींद्र शिंदे यांचा आज वाढदिवस असल्याने तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांनी केक व पुष्पगुच्छ  देऊन  त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना-उबाठा पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करत विजयश्री खेचून आणायसाठी योग्य तो सन्मान ठेऊन आपसामध्ये चांगल समन्वय ठेऊन  मतदारंमध्ये महाविकास आघाडी ची भूमिका मांडण्या संदर्भात सूचना केल्या व पुढे तिन्ही पक्षाच्या समन्वय समिती च्या माध्यमातून निवडूक रणनीती ठरवून सामोरे जाण्याची भूमिका स्पष्ट केली.


Comments