स्वच्छतेचा संदेश: नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी उचलली कचरामुक्तीची मोहीम वरोरा, दि. १८ मार्च – 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२५-२६' अंतर्गत वरोरा नगर परिषदेच्या वतीने आयोजित विशेष स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष अर्चना ठाकरे आणि नगरसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. बुधवारी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तलाव परिसरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष श्रीमती ठाकरे यांच्यासह नगरसेवकांनी हातात झाडू घेऊन परिसरातील कचरा साफ केला. विशेषतः शहराच्या मध्यभागी असलेले गांधी योग उद्यान आणि आजूबाजूच्या भागात स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, "आपल्या शहराला सुंदर आणि आरोग्यदायी बनवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ प्रशासनच नाही, तर जेव्हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने शहराचा कायापालट होतो." स्वच्छता राखण्याची जबाबदारी नगरपालिकेवर जशी आहे तशीच येथील जनतेवर सुद्धा आहे त्यामुळे घरापुढील कचरा साफ ठेवण्य...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment