नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार.- खा. प्रतिभा धानोरकर

लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार.- खा. प्रतिभा धानोरकर

माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी झरी-जामणी येथे आयोजित जनता दरबारात केले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून संपुर्ण लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा जिंकन्याचा संकल्प कॉग्रेसच्या आढावा बैठकीत केला होता. त्या अनुषंगाने बैठका, जनता दरबार यासह कामाची भुमीपुजने, लोकार्पणे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुरु केली आहेत. दि. 24 सप्टेंबर रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविणे हे माझे कर्तव्य असून ती समस्या सोडविण्याचा मी संकल्प केला आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात मी जनता दरबार घेणार असून नागरीकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. याप्रसंगी मंचावर माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेस तालुकाध्यक्ष आशिष खुलसंगे, संजय खाडे, प्रकाश कासावार, तेजराज बोढे, श्री. आवारी व श्री येलेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर जनता दरबार अनेक नागरीकांच्या समस्यांचे समाधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. नागरीकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार देखील मानले.

Comments