वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण.  श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६  श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) व निधी मंत्री नागपूर यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे. "करने वाला श्माम करन वाला श्माम" कार्यक्रमांमध्ये ...

मतदान बूथ केंद्र वाढवण्याची मागणी: दिनेश चोखारे लांबच लांब रांगामुळे होऊ शकतो मतदानावर परिणाम

मतदान बूथ केंद्र वाढवण्याची मागणी: दिनेश चोखारे 
लांबच लांब रांगामुळे होऊ शकतो मतदानावर परिणाम 
 
चंद्रपूर :- 
मागील लोकसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्याने मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विधानसभा 2024च्या निवडणुकांमध्ये या समस्यांना सामोरे जाण्यासाठीजिल्हा कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांनी मतदानाचे बूथ केंद्र वाढवण्याची मागणी केली आहे.

चोखारे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, मागील निवडणुकीत अनेक बूथ केंद्रावर वर रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले. त्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात खूप अडचणी आल्या. या कारणांमुळे मतदानाच्या सरासरीवर परिणाम होतो, ज्यामुळे लोकांचा सहभाग कमी होतो. 

रांगेत वाट पाहण्यात घालवलेला वेळ कमी करण्यासाठी बूथ केंद्र वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, यामुळे मतदारांना सोयीचा अनुभव मिळेल आणि लोकतंत्रातील त्यांच्या सहभागाला चालना मिळेल. 


मतदान प्रक्रिया अधिक सुकर करण्यासाठी मतदानाचे बूथ केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे. हे फक्त मतदारांच्या सोईसाठी नाही, तर लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.

Comments