खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

मतदान बूथ केंद्र वाढवण्याची मागणी: दिनेश चोखारे लांबच लांब रांगामुळे होऊ शकतो मतदानावर परिणाम

मतदान बूथ केंद्र वाढवण्याची मागणी: दिनेश चोखारे 
लांबच लांब रांगामुळे होऊ शकतो मतदानावर परिणाम 
 
चंद्रपूर :- 
मागील लोकसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्याने मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विधानसभा 2024च्या निवडणुकांमध्ये या समस्यांना सामोरे जाण्यासाठीजिल्हा कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांनी मतदानाचे बूथ केंद्र वाढवण्याची मागणी केली आहे.

चोखारे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, मागील निवडणुकीत अनेक बूथ केंद्रावर वर रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले. त्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात खूप अडचणी आल्या. या कारणांमुळे मतदानाच्या सरासरीवर परिणाम होतो, ज्यामुळे लोकांचा सहभाग कमी होतो. 

रांगेत वाट पाहण्यात घालवलेला वेळ कमी करण्यासाठी बूथ केंद्र वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, यामुळे मतदारांना सोयीचा अनुभव मिळेल आणि लोकतंत्रातील त्यांच्या सहभागाला चालना मिळेल. 


मतदान प्रक्रिया अधिक सुकर करण्यासाठी मतदानाचे बूथ केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे. हे फक्त मतदारांच्या सोईसाठी नाही, तर लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.

Comments