नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील नागरिकांना येणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हा शांतता समिती सदस्य तथा माजी सभापती छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषदेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात शेख यांनी नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा पाढा वाचताना सांगितले की, "शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत." त्यांनी पुढील मागण्यांचे निवेदन सादर केले: घंटागाडी सेवा – दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर १-२ दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा. कीटकनाशक फवारणी – अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करावी. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त – शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक न...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment