प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमली भद्रावती नगरी**हजारो भाविकांनी घेतले श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन*

*हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमली भद्रावती नगरी*

*हजारो भाविकांनी घेतले श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             विदर्भातील सुप्रसिद्ध व प्राचीन भद्रनाग मंदिरात नागपंचमीनिमित्त नागपंचमी यात्रेला प्रारंभ झाला. यानिमित्ताने शहराबरोबरच विदर्भातील हजारो भाविकांनी श्री भद्रनाग  स्वामींचे दर्शन घेतले. येथील सुप्रसिद्ध भद्रनाग  मंदिरात दरवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते. आज सकाळी पाच वाजता श्री भद्रनाग  स्वामींचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले करण्यात आले.
 सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी सुरू झाली. यानिमित्ताने मंदिर प्रशासनातर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने  सजवण्यात आली आहे. याचबरोबर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना सहजरित्या दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात पुरेशी व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरात व मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून मंदिरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता गांधी चौकातून वाहनांसाठी बंद करण्यात आला व ही वाहतूक अन्य रस्त्यावरून वळवण्यात आली. सायंकाळच्या सुमारास भाविकांच्या गर्दीत चांगलीच वाढ झाली. मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांतर्फे फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.



Comments