वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे .

वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे . वरोरा (जि. चंद्रपूर), दि. १२ मार्च: इंडिया कॅरम क्लब, वरोरा तर्फे येत्या २२, २३, २४ व २५ मार्च रोजी भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिद्धिविनायक सभागृह, पोलीस स्टेशन समोर, वरोरा (नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत) येथे पार पडणार आहे. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केल्या जाते. स्पर्धेत सिंगल व डबल अशा दोन्ही गटांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सिंगल गटात प्रथम क्रमांकास ३१,००१ रुपये, द्वितीय क्रमांकास १५,००१ रुपये , तृतीय क्रमांकास ७,००१ रुपये  देण्यात येतील. डबल गटात प्रथम क्रमांकास ४१,००१ रुपये (मा.सौ. अर्चना आशिषभाऊ ठाकरे, नगराध्यक्षा, स्व. बाबाजी खापने स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. जगदीश खापणे, मा.सौ. लिना संजय गयनेवार यांचेतर्फे), द्वितीय क्रमांकास २५,००१ रुपये (स्व. अभय मेश्राम स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. भारत नेरकर, मा.श्री. मनीष जेठानी, मा.श्री. कुणाल रुयारकर, मा.श्री. गजानन जीवतोडे, मा.श्री. भरत तेला यांचेतर्फे), तृतीय क्रमांकास ११,००१ रुपये (मा.श्री. क...

*हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमली भद्रावती नगरी**हजारो भाविकांनी घेतले श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन*

*हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमली भद्रावती नगरी*

*हजारो भाविकांनी घेतले श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             विदर्भातील सुप्रसिद्ध व प्राचीन भद्रनाग मंदिरात नागपंचमीनिमित्त नागपंचमी यात्रेला प्रारंभ झाला. यानिमित्ताने शहराबरोबरच विदर्भातील हजारो भाविकांनी श्री भद्रनाग  स्वामींचे दर्शन घेतले. येथील सुप्रसिद्ध भद्रनाग  मंदिरात दरवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते. आज सकाळी पाच वाजता श्री भद्रनाग  स्वामींचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले करण्यात आले.
 सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी सुरू झाली. यानिमित्ताने मंदिर प्रशासनातर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने  सजवण्यात आली आहे. याचबरोबर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना सहजरित्या दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात पुरेशी व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरात व मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून मंदिरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता गांधी चौकातून वाहनांसाठी बंद करण्यात आला व ही वाहतूक अन्य रस्त्यावरून वळवण्यात आली. सायंकाळच्या सुमारास भाविकांच्या गर्दीत चांगलीच वाढ झाली. मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांतर्फे फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.



Comments