वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे .

वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे . वरोरा (जि. चंद्रपूर), दि. १२ मार्च: इंडिया कॅरम क्लब, वरोरा तर्फे येत्या २२, २३, २४ व २५ मार्च रोजी भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिद्धिविनायक सभागृह, पोलीस स्टेशन समोर, वरोरा (नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत) येथे पार पडणार आहे. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केल्या जाते. स्पर्धेत सिंगल व डबल अशा दोन्ही गटांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सिंगल गटात प्रथम क्रमांकास ३१,००१ रुपये, द्वितीय क्रमांकास १५,००१ रुपये , तृतीय क्रमांकास ७,००१ रुपये  देण्यात येतील. डबल गटात प्रथम क्रमांकास ४१,००१ रुपये (मा.सौ. अर्चना आशिषभाऊ ठाकरे, नगराध्यक्षा, स्व. बाबाजी खापने स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. जगदीश खापणे, मा.सौ. लिना संजय गयनेवार यांचेतर्फे), द्वितीय क्रमांकास २५,००१ रुपये (स्व. अभय मेश्राम स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. भारत नेरकर, मा.श्री. मनीष जेठानी, मा.श्री. कुणाल रुयारकर, मा.श्री. गजानन जीवतोडे, मा.श्री. भरत तेला यांचेतर्फे), तृतीय क्रमांकास ११,००१ रुपये (मा.श्री. क...

बांगलादेशातील हिंदू वर होणाऱ्या अत्याचारा विरोधात बंद व निषेध मोर्चा

बांगलादेशातील हिंदू वर होणाऱ्या अत्याचारा विरोधात बंद व निषेध मोर्चा :-
 वरोरा :-हरीश केशवानी 
                    बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शहरातील सकल हिंदू समाजा द्वारे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते त्या पार्शवभूमीवर दिनांक 16 ऑगस्ट रोज शुक्रवारला सर्व जातीच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात सहभाग घेऊन अत्याचार विरोधात निषेध मोर्चात सहभाग घेतला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने व शैक्षणिक संस्था पूर्णतः बंद होत्या. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत या बंदचे आव्हान करण्यात आलेले होते.शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने स्वयं स्फूर्तीने बंद ठेवली होती.
                    बांगलादेशात सरकार आणि न्यायव्यवस्था स्थिर नसल्याकारणाने तिथे हिंसक घटनांना वाव मिळत आहे. हिंदूवर अत्याचार शिगेला पोहोचला आहे. हिंदूंची घरे, दुकाने जाळणे आणि मूर्ती तोडणे व मंदिरे तोडणे इत्यादी दृष्कृते त्या ठिकाणी होत आहे. दिवसेंदिवस महिला वरील अत्याचार वाढतच आहे. सत्तांतर झाल्यानंतर तिथे हिंसाचार उफाळला आहे. हिंदू वर होत असलेल्या अत्याचार संबंधी शहरातील सकल हिंदू समाजा तर्फे शिवाजी चौक ते राम मंदिर पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली तसेच नंतर राम मंदिर येथून डोंगरवार चौक,आंबेडकर चौक, शहीद स्मारक चौक ते तहसील कार्यालय पर्यंत शांतीपूर्वक पायदळ रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालय येथे देशाच्या मा.राष्ट्रपती, मा.प्रधानमंत्री आणि मा.मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Comments