खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, दिनांक ११/३/२०२६: राज्यातील खाजगी शाळांकडून पालकांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. शाळांच्या आवारातच पुस्तके, वह्या व गणवेश यांच्या विक्रीतून सुरू असलेल्या नफेखोरीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. वरोरा येथील सेंट ॲन्स पब्लिक स्कूलवर अलीकडेच कारवाई करण्यात आले होती.  राज्यातील बहुतांश खाजगी शाळांनी शिक्षणाचा पवित्र व्यवसाय बाजूला ठेवून व्यावसायिक नफेखोरीचा मार्ग अवलंबला आहे. शाळेच्या आवारातच पुस्तके, वह्या आणि गणवेशाची विक्री सक्तीची केली जाते. विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांना केली जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: · प...

वरोरा येथील मालवीय वार्डातील डायरियाची लागण होऊन बालकाचा मृत्यू झालेल्या प्रकरणात जबाबदार व्यक्तीस कठोर शासन करा.नागरिकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.

वरोरा येथील मालवीय वार्डातील डायरियाची लागण होऊन बालकाचा मृत्यू झालेल्या प्रकरणात जबाबदार व्यक्तीस कठोर शासन करा.

नागरिकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. 


वरोरा 8/7/24
चेतन लुतडे 
वरोरा  येथील मालवीय प्रभागातील नळाच्या पाईप लाईन वॉल मधून सांड पाण्याच्या नालीचे पाणी आत जाऊन दूषित झालेले पाणी पिल्याने या परिसरातील अनेक नागरिकांना डायऱ्याची लागण झाली होती .तर डायरिया होऊन उपचारादरम्यान पूर्वेस सुभाष वांढरे वचार या बालकाचा मृत्यू झाला. यामध्ये जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी या संबंधाची मागणी वार्डातील नागरिकांनी केली आहे. 
 यासोबतच प्रभागात मोठ्या प्रमाणात गवत, काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.  प्रभागातील स्ट्रीट लाईट नेहमी बंद राहते पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. प्रभागातील नाल्यांची नियमित सफाई केली जात नाही नाल्या सफाई केल्यास तो गाळ कित्येक दिवस उचलल्या जात नाही . अशा अनेक समस्या मालवीय प्रभागात आहे. त्या त्वरित सोडवण्यात याव्या ही विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. 
 अन्यथा नगर परिषदेवर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल काही अनुचित घटना घडल्यास ही प्रशासन जबाबदार  राहील. या आशयाचे परिसरातील नागरिकांच्या सह्याचे  निवेदन नगरपालिकेचे सीओ , तहसीलदार, पोलीस ठाणेदार व संबंधित विभागाकडे व अधिकाऱ्याकडे देण्यात आलेले आहे. 
हे निवेदन सादर करताना  लखन केशवानी, बंडू लभाने, महेश पवार, अमित घोडमारे ,प्रणय खातकर, किसन कळसकर आदी नागरिक उपस्थित होते.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री सहाय्यता केंद्र उभारणार. जिल्हाप्रमुख नितिन मत्ते.

Comments