प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*वरोडा उड्डाण पुलावर पुन्हा एक अपघात*

*वरोडा उड्डाण पुलावर पुन्हा एक अपघात* 

वरोडा : श्याम ठेंगडी 
     वरोडा येथे उड्डाण पुलावर 14 जुलै रोज रविवारला पुन्हा एक अपघात थोडक्यात होता होता वाचला. परंतु या प्रकरणात शहरातील प्रसिद्ध व्यवसाय व्यवसायिक यांच्या कारचे बरेच नुकसान झाले.
       या उड्डाण पुलावर एका दिवसापूर्वीच अपघात होऊन त्यात दोन लहान मुलांसोबत सह एकूण चार जण जखमी झाले होते. वरोडा शहरातील व्यवसायिक सादिक अली व त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष व प्रदेश भाजप अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांना आलिशान मंगल कार्यालयातून घेण्यासाठी त्यांचा चालक होंडा सिटी कंपनीची कार क्रमांक एम एच 49 यु 5555 ने 14 जुलै रोज रविवारला रात्री साडेदहाच्या सुमारास जात होता. त्यावेळी टोल नाक्यावर एम एच 40 एन 6670 क्रमांकाचा 20 चाकांचा हायवा उभा होता. या हायवा ट्रक  वेकोलीच्या एकोना खाणीतून कोळसा भरून वणीला जात होता. त्यामुळे त्या हायवाच्या मागे ही कार जाऊन उभी राहिली. परंतु हायवा चालकाने अचानक आपला हायवा वेगाने मागे आणला. त्यामुळे कारच्या समोरील भाग क्षतीग्रस्त झाला व त्यामुळे कारचे बरेच नुकसान झाले.
     सदर हायवा हा चंद्रपूर येथील वहाज अली शेख यांच्या मालकीचा असून मारेगाव येथील राजू खिरटकर हा तो चालवत होता. 
         वरोडा शहरातून कोळशाची अवैधपणे वाहतूक होत नसल्याचे वेकोली प्रशासन सांगत असून शासकीय प्रशासनाने ही वाहतूक शहरातून होऊ नये यासाठी बंधन घातलेले आहे. असे असले तरी शहरातील मुख्य रस्त्यावरून कोळशाची अवैधपणे वाहतूक राजरोसपणे सुरू असते.यावर मात्र कोणाचेही बंधन नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.
     कारचालक अजर खान याने योग्य काळजी घेतल्याने पुढील अनर्थ टाळला. अन्यथा वेगळेच अघटित घडले  असते.
 या निमित्याने शहरातून होणारी कोळशाची अवैध वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.
हायवा चालकाने सदर ट्रक एका पोलिसाचा असल्याचे अगोदर सांगितले होते. परंतु काही वेळाने त्याने यात सुधारणा केली. त्यामुळे या अवैध व्यवसायात आणि प्रशासनाचे काही लागेबंधे तर नाही ना अशी शंका घेण्यास हरकत नाही.


              happy birthday Parth 

Comments