खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, दिनांक ११/३/२०२६: राज्यातील खाजगी शाळांकडून पालकांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. शाळांच्या आवारातच पुस्तके, वह्या व गणवेश यांच्या विक्रीतून सुरू असलेल्या नफेखोरीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. वरोरा येथील सेंट ॲन्स पब्लिक स्कूलवर अलीकडेच कारवाई करण्यात आले होती.  राज्यातील बहुतांश खाजगी शाळांनी शिक्षणाचा पवित्र व्यवसाय बाजूला ठेवून व्यावसायिक नफेखोरीचा मार्ग अवलंबला आहे. शाळेच्या आवारातच पुस्तके, वह्या आणि गणवेशाची विक्री सक्तीची केली जाते. विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांना केली जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: · प...

*वरोडा उड्डाण पुलावर पुन्हा एक अपघात*

*वरोडा उड्डाण पुलावर पुन्हा एक अपघात* 

वरोडा : श्याम ठेंगडी 
     वरोडा येथे उड्डाण पुलावर 14 जुलै रोज रविवारला पुन्हा एक अपघात थोडक्यात होता होता वाचला. परंतु या प्रकरणात शहरातील प्रसिद्ध व्यवसाय व्यवसायिक यांच्या कारचे बरेच नुकसान झाले.
       या उड्डाण पुलावर एका दिवसापूर्वीच अपघात होऊन त्यात दोन लहान मुलांसोबत सह एकूण चार जण जखमी झाले होते. वरोडा शहरातील व्यवसायिक सादिक अली व त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष व प्रदेश भाजप अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांना आलिशान मंगल कार्यालयातून घेण्यासाठी त्यांचा चालक होंडा सिटी कंपनीची कार क्रमांक एम एच 49 यु 5555 ने 14 जुलै रोज रविवारला रात्री साडेदहाच्या सुमारास जात होता. त्यावेळी टोल नाक्यावर एम एच 40 एन 6670 क्रमांकाचा 20 चाकांचा हायवा उभा होता. या हायवा ट्रक  वेकोलीच्या एकोना खाणीतून कोळसा भरून वणीला जात होता. त्यामुळे त्या हायवाच्या मागे ही कार जाऊन उभी राहिली. परंतु हायवा चालकाने अचानक आपला हायवा वेगाने मागे आणला. त्यामुळे कारच्या समोरील भाग क्षतीग्रस्त झाला व त्यामुळे कारचे बरेच नुकसान झाले.
     सदर हायवा हा चंद्रपूर येथील वहाज अली शेख यांच्या मालकीचा असून मारेगाव येथील राजू खिरटकर हा तो चालवत होता. 
         वरोडा शहरातून कोळशाची अवैधपणे वाहतूक होत नसल्याचे वेकोली प्रशासन सांगत असून शासकीय प्रशासनाने ही वाहतूक शहरातून होऊ नये यासाठी बंधन घातलेले आहे. असे असले तरी शहरातील मुख्य रस्त्यावरून कोळशाची अवैधपणे वाहतूक राजरोसपणे सुरू असते.यावर मात्र कोणाचेही बंधन नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.
     कारचालक अजर खान याने योग्य काळजी घेतल्याने पुढील अनर्थ टाळला. अन्यथा वेगळेच अघटित घडले  असते.
 या निमित्याने शहरातून होणारी कोळशाची अवैध वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.
हायवा चालकाने सदर ट्रक एका पोलिसाचा असल्याचे अगोदर सांगितले होते. परंतु काही वेळाने त्याने यात सुधारणा केली. त्यामुळे या अवैध व्यवसायात आणि प्रशासनाचे काही लागेबंधे तर नाही ना अशी शंका घेण्यास हरकत नाही.


              happy birthday Parth 

Comments