प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

स्थानिक प्रश्नावरून कर्नाटका एम्टाच्या आंदोलनात अधिकाऱ्यास मारहाण.

स्थानिक प्रश्नावरून कर्नाटका एम्टाच्या आंदोलनात अधिकाऱ्यास मारहाण. 

चंद्रपूर 
अंकुश अथव

 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण, 

स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केले होते आंदोलन, आंदोलनस्थळी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली भेट, 

 यादरम्यान आंदोलक व व्यवस्थापक यांच्यात मागण्याच्या पुर्ततेवरून झाली शाब्दिक चकमक, मारहाणीनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले,  काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम पाडले बंद

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण करण्यात आली. खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आंदोलनस्थळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली.  चर्चेरम्यान आंदोलक व व्यवस्थापक यांच्यात मागण्याच्या पुर्ततेवरून आधी शाब्दिक चकमक व नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले.  काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहे.



Comments