खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख पद बदलल्याने जिल्हाप्रमुखाची नाराजी.जिल्हाप्रमुखासह कार्यकर्ते मुंबईला रवाना.

चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख पद बदलल्याने जिल्हाप्रमुखाची नाराजी.

जिल्हाप्रमुखासह कार्यकर्ते मुंबईला रवाना.

वरोरा 
चेतन लुतडे वरोरा 

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या वतीने वरोरा विधानसभा व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचा विरोध करत जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. निष्ठावंत शिवसैनिक विश्वासात न घेता पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा सर्व शिवसैनिकांनी जिल्हा कार्यालय समोर निषेध व्यक्त केला.

 वरोरा - भद्रावती विधानसभा शिवसेनेचा गड मानला जातो. या क्षेत्रातील खासदार आमदार शिवसेनेतूनच गेलेले आहेत. पडझड झालेल्या शिवसेनेची जिल्ह्यामध्ये बांधणी करून विधानसभेमध्ये कणखर नेतृत्व उभे करण्यात आले होते. शिवसेनेचाच आमदार या ठिकाणी बनणार अशी आशा येणाऱ्या विधानसभेमध्ये जनतेला लागली होती. राजकारणाचे सर्व समीकरणे जीवतोडे यांच्या बाजूने उभे असताना सुद्धा कुरघोडीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पहिले सुद्धा याच पद्धतीचे राजकारण जिल्ह्यात बऱ्याचदा झाल्याने शिवसेनेवरचा विश्वास कमी झाला असल्याचे मत व्यक्त केले. 
जिल्हाप्रमुख जिवतोडे हे विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे. मात्र अचानक विधानसभेच्या निवडणुका आधी करण्यात आलेल्या फेर बदलामुळे शिवसेनेना संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप  जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.

आता विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईसाठी रवाने झाले असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली आपबिती सांगणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना उबाठा गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा वर्तविली जात आहे.
******************

Comments