वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून...

हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय संगणक साक्षरता अभियान*

*हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय संगणक साक्षरता अभियान*

अतुल कोल्हे भद्रावती :
                हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय संगणक साक्षरता अभियान सुरू आहे. भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिरादेवी येथे हे अभियान साप्ताहिक रित्या सुरू आहे. सध्याची तांत्रिक प्रगती पाहता सर्व पालक आपल्या मुलांचे प्रवेश खाजगी शाळेत घेऊ लागले आहेत. त्यामुळे गावातील व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची संख्या व विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्याकरिता मुलांना शिक्षणाची गोडी कशी वाढवता येईल व वाढत्या तंत्रज्ञानाचा अनुभव प्राथमिक वर्गापासूनच घेता यावा हे या उपक्रमाचे उद्देश समोर ठेवून हेल्पिंग हॅन्ड संस्थेने ही सुरुवात केली आहे. 
सदर उपक्रमाला उद्घाटक म्हणून चिरादेवी गावच्या सरपंच मेश्राम ताई आणि शाळेतील शिक्षक मुसळे सर उपस्थित होते आणि जवळपास ३८ मुलांचा उत्तम प्रतिसाद लाभला.  हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत चालणार आहे. सदर उपक्रमात संस्थेतील कृतांत सहारे, सोनल उमाटे, अंकित तोडे, सागर निरंजने, रीता सहारे, मनोज पेटकर, स्वप्निल मत्ते, निखिल उंबरकर, दीपक कावटे, पंकज खामनकर, कार्तिक गनफाडे व इतर सदस्य होते.

Comments