वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा**माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

*तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा*

*माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :
               तालुक्यात तथा शहरात लहान मोठे 29 तलाव आहेत. तलावांच्या या मोठ्या संख्येमुळे शहर तथा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिंगाडा तथा मस्य व्यवसाय एकवटला आहे.या व्यवसायांवर हजारो व्यवसायिक आपल्या कुटुंबाचे पोषण करीत आहे. मात्र अलीकडे या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ते गाळ साचून  उथळ झाले असून शिंगडा तथा मच्छीमार व्यवसायिकांना फटका बसला आहे. शिवाय जमिनीखालील पाण्याची पातळी सुद्धा दिवसेंदिवस खोलात चालली आहे. त्यामुळे या तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. भद्रावतीचा शिंगाडा व्यवसाय विदर्भात प्रसिद्ध असून शहर तथा तालुक्यातील तलावामुळे हा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात वाढलेलाआहे. याशिवाय मुबलक तलावामुळे येथे मच्छी व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. मात्र हे तलाव दुर्लक्षित झाल्याने तलावात गाळ साचून ते उथळ झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम या दोन्ही व्यवसायांवर झाला आहे. त्यामुळे शिंगाडा व मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे हे व्यवसाय करणाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात घठ झाली आहे. शिवाय उथळ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहत नसल्याने जमिनीची पाणी पातळीही दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर उपाय म्हणून तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी विजय वानखेडे यांनी निवेदनातून केली आहे.

Comments