वरोरा येथे भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चार लाखांचे नुकसान

वरोरा येथे भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चार लाखांचे नुकसान वरोरा, दि. 29 एप्रिल – शेंबळ फाट्याजवळ दि.27/4/26ला  रात्री दहा वाजता एका भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले असून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, देवराल (ता. मोहदा) येथील शेतकरी रामराव रामकृष्ण नंदन हे आपल्या मित्राचे ट्रॅक्टर (क्र. MH 34 BR 5019) शेतीच्या कामासाठी वापरतात. ट्रॅक्टर चालक गणेश क्षीरसागर हे वणीहून वरोराकडे येत होते. शेंबळ फाट्याजवळ टोल ओलांडल्यानंतर ते वरोरा बायपासच्या समोर गेले. वाट चुकल्याने ते परत आले आणि वरोराकडे वळत असतानाच वरोराकडून वणीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. MH 04 LY 7972) त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार ठोसा मारला. ट्रक चालकाने नाव शब्बीर अहमद (वय ५६, रा. राजुर, ता. वणी, जि. यवतमाळ) असे सांगितले. या अपघातात ट्रॅक्टरचे मुंडीचे दोन तुकडे झाले. रात्री उशिरा ट्रक मालक न आल्याने तक्रार देण्यास उशीर झाला. सोमवारी रामराव नंदन यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर...

तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा**माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

*तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा*

*माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :
               तालुक्यात तथा शहरात लहान मोठे 29 तलाव आहेत. तलावांच्या या मोठ्या संख्येमुळे शहर तथा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिंगाडा तथा मस्य व्यवसाय एकवटला आहे.या व्यवसायांवर हजारो व्यवसायिक आपल्या कुटुंबाचे पोषण करीत आहे. मात्र अलीकडे या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ते गाळ साचून  उथळ झाले असून शिंगडा तथा मच्छीमार व्यवसायिकांना फटका बसला आहे. शिवाय जमिनीखालील पाण्याची पातळी सुद्धा दिवसेंदिवस खोलात चालली आहे. त्यामुळे या तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. भद्रावतीचा शिंगाडा व्यवसाय विदर्भात प्रसिद्ध असून शहर तथा तालुक्यातील तलावामुळे हा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात वाढलेलाआहे. याशिवाय मुबलक तलावामुळे येथे मच्छी व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. मात्र हे तलाव दुर्लक्षित झाल्याने तलावात गाळ साचून ते उथळ झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम या दोन्ही व्यवसायांवर झाला आहे. त्यामुळे शिंगाडा व मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे हे व्यवसाय करणाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात घठ झाली आहे. शिवाय उथळ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहत नसल्याने जमिनीची पाणी पातळीही दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर उपाय म्हणून तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी विजय वानखेडे यांनी निवेदनातून केली आहे.

Comments