वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा**माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

*तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा*

*माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :
               तालुक्यात तथा शहरात लहान मोठे 29 तलाव आहेत. तलावांच्या या मोठ्या संख्येमुळे शहर तथा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिंगाडा तथा मस्य व्यवसाय एकवटला आहे.या व्यवसायांवर हजारो व्यवसायिक आपल्या कुटुंबाचे पोषण करीत आहे. मात्र अलीकडे या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ते गाळ साचून  उथळ झाले असून शिंगडा तथा मच्छीमार व्यवसायिकांना फटका बसला आहे. शिवाय जमिनीखालील पाण्याची पातळी सुद्धा दिवसेंदिवस खोलात चालली आहे. त्यामुळे या तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. भद्रावतीचा शिंगाडा व्यवसाय विदर्भात प्रसिद्ध असून शहर तथा तालुक्यातील तलावामुळे हा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात वाढलेलाआहे. याशिवाय मुबलक तलावामुळे येथे मच्छी व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. मात्र हे तलाव दुर्लक्षित झाल्याने तलावात गाळ साचून ते उथळ झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम या दोन्ही व्यवसायांवर झाला आहे. त्यामुळे शिंगाडा व मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे हे व्यवसाय करणाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात घठ झाली आहे. शिवाय उथळ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहत नसल्याने जमिनीची पाणी पातळीही दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर उपाय म्हणून तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी विजय वानखेडे यांनी निवेदनातून केली आहे.

Comments