प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

नारायणी सन्स इंडिया प्रा . लि . कंपनी विरोधात यलगार

नारायणी सन्स इंडिया प्रा . लि . कंपनी विरोधात यलगार

भद्रावती

शिवसेना नेते किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार  नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी स्थानिकांच्या रोजगार व वेतनाच्या मुद्द्यावर माननीय जिल्हाधिकारी विनयजी गौडा साहेब यांना निवेदन देऊन कर्नाटका एम्टा बरांज माईन्स मधील नारायणी सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे कामगारांचा होत असलेल्या शोषणाबाबत कामगारांना मागील 80 दिवसापासून न दिलेल्या पगाराबाबत निवेदन सादर केले .जवळपास 125 कामगारांचे मागील 80 दिवसापासून वेतन कंपनीकडे थकीत आहेत यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी येऊन कामगारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे .त्यांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची अतोनात अवहेलना होत आहे . याची दखल घेऊन माननीय नितीन मत्ते यांनी कंपनीने कामगारांचे वेतन तत्काळ देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कंपनी विरोधात यलगार केला यावेळी प्रतिमा ताई ठाकूर महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंद्रपूर व भरतजी गुप्ता महानगर प्रमुख चंद्रपूर हे उपस्थित होते

Comments