प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्याची एक वर्षातच लागली वाट*टेमूर्डा - जामणी बोपापुर मार्गावरील प्रकार *डब्ल्यूबीएम मध्ये वापरलेल्या साहित्यात सावळा गोंधळ

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्याची एक वर्षातच लागली वाट
*टेमूर्डा - जामणी बोपापुर मार्गावरील प्रकार 
*डब्ल्यूबीएम मध्ये वापरलेल्या साहित्यात सावळा गोंधळ

वरोरा : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून टप्पा क्रमांक -४ पीएमजीएसवाय -थ्री बॅच-१ सन २०२१-२२ अंतर्गत ५४५.६३ लाख रुपये खर्च करून टेमूर्डा-जामणी बु बोपापुर ९.५६ किलोमीटर रस्त्याच्या दर्जोन्नतीचे व त्यावरील पूल आणि नाल्यांचे काम केले होते. 
परंतु या कामात डब्ल्यूबीएम मध्ये वापरण्यात आलेल्या निकृष्ट साहित्यामुळे आणि डांबराच्या कमी थरामुळे  ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण झालेल्या या रस्त्याची मागील सहा महिन्यांपासून वाट लागली आहे. असा दर्जाहीन रस्ता तयार होत असताना संबंधित अधिकारी काय करत होते असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

 तसेच सदर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परिणामी सदर कामाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.
 वरोरा तालुक्यातील एमआरएल -०६ राष्ट्रीय महामार्ग ३४७(अ)‌ टेमूर्डा ते जामणी बु बोपापूर इंजिमा-०४ या  ९.५६ किलोमीटर रस्त्याच्या दर्जोन्नतीचे व त्यावरील ३ पूल आणि २७ मोरीचे बांधकाम नागपूर येथील एन एम पुगलिया यांना देण्यात आले होते. त्यांनी सदर काम २० ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करून ते १९ ऑक्टोबर २०२२ रोजी पूर्ण केले होते .
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अर्थसहाईत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर काम झाले होते. यावर ८.९४ किलोमीटर  डांबरीकरण रस्ता व ०.६२० किलोमीटर सिमेंट रस्ता तयार करणे होते. तसेच या मार्गावर ३ पूल आणि २७ मोरीचे आणि ६०३ मीटर पक्की नालीचे बांधकाम करण्यात येणार होते. 
सदर काम शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमानुसारच व्हायला हवी होते. परंतु सदर कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने हा रोड खराब झाला आहे. 
भारत सरकारचे रोड बांधण्याबाबतचे फलक या ठिकाणी लागून आहे मात्र या फलकानुसार बरेचसे काम अपूर्ण असल्याचेही दिसून आले. 
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी करून अहवाल मागवावा ही मागणी जनतेकडून केली जात आहे. 
येणाऱ्या काळात जामणी रस्त्याचे दुरुस्ती करून न झाल्यास गावातील लोकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

Comments