वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

केंद्र शासनाच्या नवीन चालक कायदा विरोधात आंदोलनाला सुरुवात

केंद्र शासनाच्या नवीन चालक कायदा विरोधात  आंदोलनाला सुरुवात 


वरोरा /चेतन लुतडे 

राष्ट्रवादीचे भद्रावती तालुकाप्रमुख सुधाकर रोहनकर यांचे नेतृत्वात वरोरा उपविभागीय कार्यालयावर आज ड्रायव्हर चालकांनी निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदविला आहे.


यावेळी चालकांनी नारेबाजी करीत रद्द करा रद्द करा जुलमी कायदा रद्द करा, मोदी शासन मुर्दाबादच्या घोषणा देत चालकांनी आपला संताप व्यक्त केला.

केंद्र शासनाने नवीन चालक कायदा पारित करीत चालकाच्या हातून अपघात झाल्यास दहा लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा अशी तरतूद केली आहे. या कायद्याला त्वरित रद्द करण्याची मागणी ड्रायव्हर संघटनेने केली आहे. महाराष्ट्रात सगळीकडे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या कायद्याचा निषेध नोंदवत संघटना रस्त्यावर उतरतील अशी धमकी सरकारला दिली आहे.

आधीच वाहन चालवीत असताना अनेक संकटांना ड्रायव्हरला तोंड द्यावे लागते.चालकांच्या वाहनाने अपघात झाल्यानंतर चालक जर घटनास्थळी थांबला तर त्याला जमावाकडून जीवे मारण्याची शक्यता असते.

तसेच चालक हा आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने तो दहा लाख दंड देऊ शकत नाही.दहा वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचा कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या कायद्यांचा निषेध नोंदवत ड्रायव्हर संघटना उग्र झाले आहे.


Comments