वरोरा वाळूघाट हत्याकांड: १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी, पोलिसांवर हल्ल्याचा आरोप

वरोरा वाळूघाट हत्याकांड: १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी,  पोलिसांवर हल्ल्याचा आरोप. महसूल विभागाचे कमालीचे दुर्लक्ष, महसूल मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज.  वरोरा (10/3/2026) : वर्धा नदीच्या बामर्डा वाळूघाटावर  भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व १२ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत (एमसीआर) पाठवले आहे. यापैकी चार आरोपींनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एक मार्च रोजी वाळू घाटावर थकबाकीच्या वादातून झालेल्या हिंसक हल्ल्यात भरत नागपाल यांचा मृत्यू झाला होता.  वाळू व्यवसायिक पंकज वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ जणांविरुद्ध भादंविच्या विविध कलमांसह गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल रामचंद्र कामडी, सौरभ दिलीपसिंग ठाकूर, अक्षय विजयराव खडसे, उदय भास्कर वांदिले, अतुल पुरुषोत्तम मोटघरे, सुनील नारायण ढोरे, प्रफुल्ल सूर्यभान उमाटे, नितीन यशवंत कामडी, अजय उर्फ गोलू दिपसिंग इरपाचे, प्रकाश शंकर कासारे, प्रविण कवडुजी व...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वरोडा येथे भव्य आंदोलन*

*मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वरोडा येथे भव्य आंदोलन*

वरोडा : श्याम ठेंगडी वरोरा
         मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज एक नोव्हेंबर रोज बुधवार ला येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लक्षणिक उपोषणात अनेक मराठा समाजातील पुरुष,महिला व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेल्या मुदतीतही आरक्षणाबद्दल शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने येथील मराठा सकल मराठा समाजातर्फे जरांगे यांच्या उपोषणाच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हे एक दिवसाचे लक्षणिक उपोषण करण्यात आले.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शाळेमध्ये जाणारे लहान मुले सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा ... अशा अनेक घोषणा देत सरकारला सतर्कतेचा इशारा आपल्या आंदोलनातून दिला. 
      येथील उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी लाक्षणिक उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांनी त्यांना दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले.
       महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या जनभावनेचा योग्य आदर करीत मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे.अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन समाजातर्फे करण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असा इशारा या निवेदनातून घेण्यात आला.

Comments