खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. ग्रामपंचायत जळका येथील सरपंच ,सचिव यांचे दुर्लक्ष

स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.

ग्रामपंचायत जळका येथील सरपंच ,सचिव यांचे दुर्लक्ष

वरोरा
चेतन लूतडे 


वरोरा तालुक्यातील माढळी जवळ असलेल्या जळका गावातील रस्त्याची दयनीय अवस्था असून स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.

जळका या गावाच्या काही अंतरावर स्मशानभूमी असून या स्मशानभूमी कडे जाणारा मार्गची  दैनावस्था झाली की हा रस्ता पुर्णतः खराब झालेला आहे. या रस्त्याच्या मधोमध पाणी वाहत असून रस्ता आहे की नाला हे कळयला मार्ग नाही.
 अंत्यसंस्काराला जाणारे लोक  तसेच  मयत घेऊन चालणारे कधीही प्रेत घेऊन खाली पडू शकेल एवढा हा रस्ता खराब झालेला आहे.  गावातील काही लोकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अनेक वेळा या स्मशानभूमी रस्त्याबद्दल बोलूनही  याकडे जळका गावातील सरपंच, सचिव तसेच प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अंत्यसंस्काराला जाणाऱ्या लोकांचे कधीही रस्त्यावर पडून नुकसान होऊ शकते. कमीत कमी ग्रामपंचायत मधील सामान्य फंडातून  तात्काळ रस्ता करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
या गावात ग्रामपंचायतीने मरण पावलेल्या  लोकांसाठी तरी रस्ता करून द्यावा. असा लाजिरवानाआ प्रश्न सरपंच व सचिवाला लोक विचारत आहे.

गावकऱ्यांचे  स्मशानभूमी कडे जाण्यासाठी हाल होत असून हा  रस्ता केव्हा बनणार असे सर्व गावकरी बोलून रोष व्यक्त करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.

 

Comments