पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर

  पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर वरोरा (जि. चंद्रपूर) : राज्यातील पुनर्वसन झालेल्या गावांपैकी अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत महसूल दर्जा मिळवून शेतकऱ्यांच्या हाती सातबारा पोहोचविणारे रानतळोदी हे पहिले गाव ठरले आहे. या गावातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित विशेष शिबिरात सातबाऱ्याचे वितरण करण्यात आले. स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील मुख्यमंत्री हॉलमध्ये दिनांक १४ मार्च रोजी हे शिबिर पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार श्री. कोटकर, आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे श्री. कडू गुरुजी, जिल्हा शांतता समितीचे सदस्य तथा वरोराचे माजी सभापती शेख जैरुदीन छोटूभाई, उपविभागीय अधिकारी श्री. गुळाणे, नायब तहसीलदार श्री. बर्डे व भूमी अभिलेखाचे श्री. पवार उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते रानतळोदी येथील शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी...

श्रेयश निबूदेचं NEET परीक्षेतील यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद: किशोर टोंगे

श्रेयश निबूदेचं NEET परीक्षेतील यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद: किशोर टोंगे 


वरोरा:

सन 2023 मध्ये झालेल्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परिक्षा NEET मध्ये भद्रावती तालुक्यातील सागरा येथील सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष युवराज निबूदे यांचे चिरंजीव श्रेयश याने एकूण 680 गुण प्राप्त करत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश मिळवले आहे हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

यानिमित्ताने श्रेयशची भेट घेऊन त्याचे स्वागत आणि सत्कार केला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन स्व प्रतिभेवर हे यश मिळवण खरंतर खूप कठीण असतं. देशापातळीवर होणाऱ्या या परीक्षेत मोठी स्पर्धा असते. शहरी भागात सर्व सुविधा आणि कोचिंग मार्गदर्शन असते मात्र आमच्या शेतकरी बांधवांच्या मुलांना या सुविधा अभावानेच मिळतात अशा इतर मुलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

यासाठी श्रेयश आणि त्यांचे आईवडील चंदा आणि युवराज निबूदे देखील कौतुकास पात्र आहेत. माझं इतर पालकांना देखील आवाहन आहे की आपल्या पाल्याला योग्य मार्गदर्शन करत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आपण उभे राहिल्यास त्याला त्यांच्या क्षेत्रात यश नक्की मिळते.

आमच्या नातेवाईक मंडळीत देखील मी पहिला इंजिनियर झालो होतो आज आता श्रेयश पहिला डॉक्टर होणार आहे याचा मला निश्चितच आनंद आहे. कुटुंबातील एक व्यक्ती शिकली तर कुटुंबाचं भाग्य बदलत म्हणून योग्य आणि दर्जेदार शिक्षणाच्या संधी आपण मुलांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे असंही किशोर टोंगे यावेळी म्हणाले.

Happy anniversary om bha

Comments