पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर

  पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर वरोरा (जि. चंद्रपूर) : राज्यातील पुनर्वसन झालेल्या गावांपैकी अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत महसूल दर्जा मिळवून शेतकऱ्यांच्या हाती सातबारा पोहोचविणारे रानतळोदी हे पहिले गाव ठरले आहे. या गावातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित विशेष शिबिरात सातबाऱ्याचे वितरण करण्यात आले. स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील मुख्यमंत्री हॉलमध्ये दिनांक १४ मार्च रोजी हे शिबिर पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार श्री. कोटकर, आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे श्री. कडू गुरुजी, जिल्हा शांतता समितीचे सदस्य तथा वरोराचे माजी सभापती शेख जैरुदीन छोटूभाई, उपविभागीय अधिकारी श्री. गुळाणे, नायब तहसीलदार श्री. बर्डे व भूमी अभिलेखाचे श्री. पवार उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते रानतळोदी येथील शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी...

वरोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २ जुलै रोजी सत्कार

वरोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २ जुलै रोजी सत्कार 
*किशोर टोंगे व शारदा फाउंडेशनचे आयोजन

वरोरा : येथील विविध विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस मधून दहावी, बारावी च्या परिक्षेसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार किशोर टोंगे मित्रपरिवार आणि शारदा फाउंडेशनच्या वतीने २ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
वरोरा शहर व परिसरात उत्तम शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे आणि कोचिंग क्लासेसचे जाळे पसरलेले आहे. यातुन दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. तसेच कोचिंग क्लासेस मधून देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. अशा वर्ग दहावी, बारावी, नीट, जेइइ, एमएचसीइटी, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, यासह नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्र स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी या हेतूने किशोर टोंगे मित्रपरिवार आणि शारदा फाउंडेशन च्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचे आयोजित करण्यात आले आहे. 

दि .२ जुलै रोजी स्थानिक नगर भवन मध्ये दुपारी २:३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप राहणार असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, विधान परिषदेवरील शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी आणि जेष्ठ साहित्यिक ना.गो. थुटे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सर्व निमंत्रकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन किशोर टोंगे आणि मित्रपरिवार यांनी केले आहे.

Comments