वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर

 पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर

वरोरा (जि. चंद्रपूर) : राज्यातील पुनर्वसन झालेल्या गावांपैकी अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत महसूल दर्जा मिळवून शेतकऱ्यांच्या हाती सातबारा पोहोचविणारे रानतळोदी हे पहिले गाव ठरले आहे. या गावातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित विशेष शिबिरात सातबाऱ्याचे वितरण करण्यात आले.

स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील मुख्यमंत्री हॉलमध्ये दिनांक १४ मार्च रोजी हे शिबिर पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार श्री. कोटकर, आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे श्री. कडू गुरुजी, जिल्हा शांतता समितीचे सदस्य तथा वरोराचे माजी सभापती शेख जैरुदीन छोटूभाई, उपविभागीय अधिकारी श्री. गुळाणे, नायब तहसीलदार श्री. बर्डे व भूमी अभिलेखाचे श्री. पवार उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते रानतळोदी येथील शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण करण्यात आले.
यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी मंडळ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उर्वरित सातबाऱ्याचे वितरण रानतळोदी गावात शेख जैरुदीन छोटूभाई, सरपंच सौ. मळावी आणि उपसरपंच कैलास कुंभरे यांच्या हस्ते करण्यात आले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, तालुका व जिल्ह्यातील विविध पुनर्वसन गावांना महसूल दर्जा मिळावा, त्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि गावांच्या विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शेख जैरुदीन छोटूभाई यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. याचाच एक भाग म्हणून यापूर्वी पळसगाव व कोळसा या पुनर्वसित गावांनाही महसूल दर्जा मिळवून देण्यात यश आले होते.

या कार्यक्रमात बोलताना शेख जैरुदीन छोटूभाई यांनी जिल्ह्यातील इतर पुनर्वसन गावांकडे लक्ष वेधले. "जिल्ह्यातील उर्वरित पुनर्वसन गावांमधील गोरगरिबांच्या समस्यांचे तातडीने निवारण करून त्यांना न्याय दिला नाही, तर पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

......

Comments