प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

शेतकऱ्यांच्या बैलाच्या दलालीतून खिसे गरम

शेतकऱ्यांच्या बैलाच्या दलालीतून खिसे गरम

वरोरा 19/jun23
चेतन लूतडे वरोरा 

वरोरा तालुक्यातील सर्वात मोठा बैल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अनेक जणांचे खिसे गरम होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा मध्ये सभापती विजय देवताळे उपसभापती जयंत टेंमूर्डे यांची नवीन कार्यकारिणी बसल्यानंतर कर्मचारी व इतर सदस्यांवर वचक नसल्याची बाब समोर येत आहे. रविवारी भरत असलेल्या बैल बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रत्येक बैलावर एन्ट्री फी पाच रुपये व खरेदीवर 2.10 शेकडा  शेष आकारला जातो. यामध्ये साक्षांकन फी , बाजार फी, देखरेख फी असे वर्णन नमूद केले असते.मात्र ह्या पावती व्यतिरिक्त पैसे आकारून कर्मचारी व काही व्यक्तींच्या खिशात अतिरिक्त पैसे जात असल्याची बाप चर्चेत आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकसान होत असून याला आळा घालण्यासाठी नवीन सभापतीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Comments