गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे ...

अरबिंदो कोळसा खदानीच्या संबंधात असलेली अधिकाऱ्याची बैठक शेतकऱ्यांनी हाणून पाडली.

अरबिंदो कोळसा खदानीच्या संबंधात असलेली अधिकाऱ्याची बैठक शेतकऱ्यांनी हाणून पाडली.

वरोरा
चेतन लूतडे 
भद्रावती तालुक्यातील बेलोरा टाकळी परिसरात अरविंदो रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड खाणीसाठी 936हे. जमीन संपादित करण्यासाठी बुधवारी कार्यालयीन बैठक बोलवण्यात आली. मात्र वरोरा येथील उपविभागीय कार्यालयात असलेली बैठक गावकऱ्यांनी हाणून पडली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल होऊन शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी अधिकाऱ्यांकडे तगादा लावल्याने बैठक रद्द करावी लागली. 

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खदान सुरू असून मागील कंपनीचे व्यवहार पाहता येथील शेतकऱ्यांनी पहिले एकरी 50 लाख रुपये देण्याची मागणी करत  कंपनीचे काम थांबवण्यात आले. मध्यस्थी मार्ग काढण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दोन प्रतिष्ठित नागरिक व कंपनी यांची भूसंपादन करण्यासाठी बैठक करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांना हे मान्य नसल्याने बैठकी गावकऱ्यापुढे व्हावी अशी मागणी करत कंपनी अधिकाऱ्यांकडे घेराव घालण्यात आला .त्यामूळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कंपनीच्या अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी गावकऱ्यांसोबत संगणमतीने काम करण्याचे आव्हान केले असून अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Comments