मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा

मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा Instagram link ,view for reel चंद्रपूर / भद्रावती, ता. १४ मार्च: मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे वृत्त समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ढोरवाचा-पिपरी डांबरी रस्त्याचे काम प्रशासनाने जोरात सुरू केले आहे. मात्र, या घडामोडीमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे काम अचानक सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ढोरवाचा ते पिपरी दरम्यानचा हा रस्ता गेली पंधरा वर्षे प्रचंड जीर्णावस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत तसेच ग्रामस्थांनी स्वतःहून संबंधित विभागाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने  त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलाचा तलाव बनत असे आणि नागरिकांची प्रचंड कुचंबणा व्हायची. राज्याचे मुख्यमंत्री १४ रोजी (शनि...

अरबिंदो कोळसा खदानीच्या संबंधात असलेली अधिकाऱ्याची बैठक शेतकऱ्यांनी हाणून पाडली.

अरबिंदो कोळसा खदानीच्या संबंधात असलेली अधिकाऱ्याची बैठक शेतकऱ्यांनी हाणून पाडली.

वरोरा
चेतन लूतडे 
भद्रावती तालुक्यातील बेलोरा टाकळी परिसरात अरविंदो रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड खाणीसाठी 936हे. जमीन संपादित करण्यासाठी बुधवारी कार्यालयीन बैठक बोलवण्यात आली. मात्र वरोरा येथील उपविभागीय कार्यालयात असलेली बैठक गावकऱ्यांनी हाणून पडली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल होऊन शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी अधिकाऱ्यांकडे तगादा लावल्याने बैठक रद्द करावी लागली. 

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खदान सुरू असून मागील कंपनीचे व्यवहार पाहता येथील शेतकऱ्यांनी पहिले एकरी 50 लाख रुपये देण्याची मागणी करत  कंपनीचे काम थांबवण्यात आले. मध्यस्थी मार्ग काढण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दोन प्रतिष्ठित नागरिक व कंपनी यांची भूसंपादन करण्यासाठी बैठक करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांना हे मान्य नसल्याने बैठकी गावकऱ्यापुढे व्हावी अशी मागणी करत कंपनी अधिकाऱ्यांकडे घेराव घालण्यात आला .त्यामूळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कंपनीच्या अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी गावकऱ्यांसोबत संगणमतीने काम करण्याचे आव्हान केले असून अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Comments