वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

खासदार धानोरकर यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे धाडसी, लढाऊ व खंबीर नेतृत्व हरपले* *शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांची प्रतिक्रिया*

* खासदार धानोरकर यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे  धाडसी, लढाऊ व खंबीर नेतृत्व हरपले* 
*शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांची प्रतिक्रिया* 

वरोरा : *धाडसी माणूस भीत नाही आणि आणि  भिणारा माणूस धाडस करित नाही. परंतु धाडस केल्याशिवाय कोणालास काही मिळत नाही हे निर्विवाद सत्य आहे. खासदार बाळूभाऊ धानोरकर हे त्यापैकीच एक होते .चंद्रपूर जिल्ह्याचे धाडसी, लढाऊ व खंबीर नेतृत्व युवा खासदार बाळूभाऊ धानोरकर  यांच्या मृत्युने हरपले आणि चंद्रपूर जिल्हा पोरका झाला अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्या दुःखद निधनावर दिली आहे. 

 चंद्रपूर जिल्ह्यातील भारदस्त लढाऊ युवा उंमद व्यक्तिमत्व ,राजकारणातील अभिमन्यू , विकास कामाला गती देण्यासाठी सदैव कुठल्याही पातळीवर सक्षम नेतृत्वासी दोन हात करण्यास तत्पर असणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर या युवा नेतृत्वाला चंद्रपूर जिल्हा आता पोरका झाला आहे . असं राजकारणातील नेतृत्व चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा होणे नाही.

या शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी आपल्या शोक संदेश पर भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments