वर्धा नदीत बोटीसह चारजन वाहून गेले.

वर्धा नदीत बोटीसह चारजन  वाहून गेले.

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील दिंडोदा गावानजीकच्या वर्धा नदीवर धरण बांधण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे .या प्रकल्पात चंद्रपूर, यवतमाळ ,वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे .प्रकल्प उभारणी करिता मध्य प्रदेश मधील मजूर आणले असून ते काम सुरू असलेल्या ठिकाणी वास्तव्यास आहेत .मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने वर्धा नदीमध्ये दोन्हीही काठावर पाणी आले आहे.

बुधवारी सकाळी चार वाजताच्या सुमारास प्रकल्प बांधणाऱ्या कंपनीच्या बोटीने चार व्यक्ती नदीच्या पाण्यामधील साहित्य काढत असताना बोट पाण्यात उलटली यात बोटीसह चार व्यक्ती पाण्यात वाहू लागल्याने उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केली त्यामुळे काही नागरिकांनी सतर्कता बाळगता सोईट गावा जवळच्या वर्धा नदीच्या पुलाजवळ पाण्यामध्ये उतरून चारही व्यक्तींना पकडले व सुखरूप बाहेर काढले चार व्यक्तीची व त्यांना वाचवणाऱ्या नागरिकांची नावे मात्र करू शकले नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अकरा योग पटूंचे बंगाल येथे राष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड
अहिल्याबाई होळकर पुरस्कारने योगिता लांडगे सन्मानित

Comments