चला शेतकरी जागे व्हा. आंदोलनाचा धागा व्हा !राजूरकर यांचे आव्हान

चला शेतकरी जागे व्हा. आंदोलनाचा धागा व्हा !
राजूरकर यांचे आव्हान

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा.

रमेश राजूरकर, विजय देवतळे, जयंत टेमूर्ड,किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन.

वरोरा
चेतन लूतडे

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वरोरा येथील तहसील कार्यालयावर रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. यावेळी राजूरकर समर्थक बरेच राजकीय वर्तुळातील नेते उपस्थित होते.

बऱ्याच कालावधीपासून शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नसल्याने राजूरकर समर्थक कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चाचे आयोजन गुरुवारी सकाळी वरोरा तहसील कार्यालयावर करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ.विजय देवतळे, प्रहारचे किशोर डुकरे, बाळूभाऊ भोयर, आदि राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला.

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस, सोयाबीन पीकांवरील आयात थांबवून निर्यातीबाबत निर्णय घेण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसांत पूर्ण रक्कम देण्यात यावी. व  शेतमालावरील वायदे बंदी उठवावी. अशी मागणी यावेळी राजूरकर यांनी केली.
शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्या येवू नये. अजून पर्यंत चालू शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर  शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ जमा करावा असे मत प्रहार चे किशोर डुकरे यांनी व्यक्त केले.

शेती मशागत, पेरणी ते माल विकण्यापर्यंत येणाऱ्या खर्चावर दीड पट भाव देण्यात यावा. नाफेड द्वारे होणारी चना खरेदी प्रति हेक्टर ७.५ वरून १५ क्विंटल करण्यात यावी .
अतिवृष्टी मदतीपासून दूर राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा.  ज्या शेतकऱ्यांनी वीज डिमांड भरली आहे अशा शेतकऱ्यांना दोन महिन्यात कृषी पंप वीज जोडणी देण्यात यावी.  स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.  ऑनलाईन ७/१२ मधील चुका सरकारने लवकर दुरुस्ती कराव्यात.  शेतीचे कामे संपल्यानंतर शासनामार्फत शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. वरील सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या हितासाठी असून महाराष्ट्र व केंद्र सरकारने याची दखल घेत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी डॉक्टर विजय देवतळे यांनी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या सोबत वार्तालाप करताना केली.

वरोरा शहराच्या आंबेडकर चौकामधून निघालेला मोर्चा थेट तहसील कार्यालयाच्या उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या दालनात निवेदन देऊन संपवला. मात्र यावेळी शेतकरी आक्रमक असून सुभाष शिंदे यांना आपल्या तक्रारी गिनवून दाखवल्या.
स्थानिक प्रशासनातील चुका लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यासाठी तलाठ्यांना विभागीय सूचना देऊन त्या ठिकाणच्या अडचणी दूर करण्याचे तात्काळ आदेश दिल्याने शेतकऱ्यांचे समाधान झाले.

प्रहार चे किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात सोयाबीन व कापूस भरलेले मालवाहतूक गाड्या तहसील मध्ये नेण्यासाठी आणले असता प्रशासनाने ताब्यात घेऊन माघारी केले परंतु आक्रमक शैलीमध्ये तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांनी त्याच  गाडी मधला शेतमाल काढून शासनाला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यासाठी आणला असता पोलीस निरीक्षक यांनी ताब्यात घेतला या आंदोलनामध्ये विदर्भ पुत्र  शेतकरी नेते ऍड वामनराव चटप प्रमुख नेते म्हणून उपस्थित होते

या भव्य मोर्चासाठी रमेश राजुरकर , अँड वामन चटप,विजय देवताळे, जयंत टेंमूर्डे, विजय मोकाशी, किशोर डुकरे, बाळूभाऊ भोयर, आदि राजकीय नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात...

Comments