वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण.  श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६  श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) व निधी मंत्री नागपूर यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे. "करने वाला श्माम करन वाला श्माम" कार्यक्रमांमध्ये ...

छावा छात्र संघटनेचे मारेगावात धरणे आंदोलनशिंदे सरकारचा केलात निषेध

छावा छात्र संघटनेचे मारेगावात धरणे आंदोलन
शिंदे सरकारचा केलात निषेध 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  १३,६०० हेक्टरी घोषणा करूनही तोडगी मदत  मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून  हेक्टरी ५०,००० मदत द्या.

यवतमाळ/मारेगाव : सुरज झोटिंग
मो.९२८४०६०८२०
मारेगाव : पर्जन्यवृष्टीने शेतपिके उध्वस्त झाली.शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली.मात्र शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.अशातच शिंदे सरकारच्या बोथट धोरणा विरोधी गगनभेदी घोषणा देत मारेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी आर्जव मागणी छावा छात्र संघटने कडून करण्यात आली.मारेगाव तालुक्याला पर्जन्यवृष्टीने झोडपून शेतकऱ्यांचे उभी पिके उध्वस्त केली. सरकारने मदतीची १३,६०० हेक्टरी घोषणाही केली.मात्र तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना ही मदत तोडकी स्वरूपात मिळत असल्याचे वास्तव आहे.हा सरकारचा केवळ देखावा बंद करावा व शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे मदत करावी अशी मागणी मारेगाव मध्यवर्ती बँक समोर धरणे आंदोलन करतेवेळी करण्यात आली.यावेळी शासन विरोधी घोषणा देत वर्तमान सरकार हे उद्योजकांचे कर्ज माफ करणारे असून कृषी प्रधान देशाचा पोशिंदा मात्र आत्महत्या करतो आहे.मात्र सरकार तगलादू धोरण अवलंबित असल्याचा आरोप करीत  शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला.
      प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी , महिला विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रतिभा तातेड , जिल्हाध्यक्ष राजू जुनगरी ,विदर्भ प्रांत अध्यक्ष विलास बुरांन या पदाधिकारी सह राहुल सूर , अनिल बोढाले , संदीप हूसुकले, सुधाकर कोंडेकर , दादा बोकडे , अनंता घोटेकर यांचेसह बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Comments