वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

भद्रावती :सरकारचे खाजगीकरणाचे वाढते पाऊल पाहता पोस्ट ऑफिसवाल्यांनी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार आज दिनांक १० रोजी पोस्ट ऑफिस बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या राखी सणाच्या काळात टपाल कार्यालय बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. भारतीय टपाल कार्यालयाचे खाजगीकरण करण्याच्या सरकारच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता, टपाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेला सरकारला इशारा देण्यासाठी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. आणि हे पाहता अखिल भारतीय पोस्ट ऑफिस बंद असल्याची बाब समोर आली. भद्रावती पोस्ट ऑफिससमोर आलेल्या सर्व लोकांना पोस्ट ऑफिस का बंद आहे हे समजू शकले नाही. कारण पोस्ट ऑफिसजवळ ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे पोस्टर चिकटवण्यात आले होते. या सणासुदीच्या दिवशी पोस्ट ऑफिस का बंद असते हे लोकांना समजू शकले नाही. हे पोस्ट ऑफिसच्या लोकांचे काम होते, त्यांनी किमान पोस्ट ऑफिससमोर या प्रकरणाची माहिती देण्यासाठी तेथे कोणत्याही प्रकारची माहिती लिहिली नाही. भद्रावती पोस्ट ऑफिसच्या कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही तिथे एक छोटासा फलक लावला होता, मात्र तो पावसामुळे काढला गेला असावा. पण लोकांच्या माहितीसाठी आम्ही ते फलकावर लावले आहे.

Comments