वरोरा येथे भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चार लाखांचे नुकसान

वरोरा येथे भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चार लाखांचे नुकसान वरोरा, दि. 29 एप्रिल – शेंबळ फाट्याजवळ दि.27/4/26ला  रात्री दहा वाजता एका भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले असून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, देवराल (ता. मोहदा) येथील शेतकरी रामराव रामकृष्ण नंदन हे आपल्या मित्राचे ट्रॅक्टर (क्र. MH 34 BR 5019) शेतीच्या कामासाठी वापरतात. ट्रॅक्टर चालक गणेश क्षीरसागर हे वणीहून वरोराकडे येत होते. शेंबळ फाट्याजवळ टोल ओलांडल्यानंतर ते वरोरा बायपासच्या समोर गेले. वाट चुकल्याने ते परत आले आणि वरोराकडे वळत असतानाच वरोराकडून वणीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. MH 04 LY 7972) त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार ठोसा मारला. ट्रक चालकाने नाव शब्बीर अहमद (वय ५६, रा. राजुर, ता. वणी, जि. यवतमाळ) असे सांगितले. या अपघातात ट्रॅक्टरचे मुंडीचे दोन तुकडे झाले. रात्री उशिरा ट्रक मालक न आल्याने तक्रार देण्यास उशीर झाला. सोमवारी रामराव नंदन यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर...

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

भद्रावती :सरकारचे खाजगीकरणाचे वाढते पाऊल पाहता पोस्ट ऑफिसवाल्यांनी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार आज दिनांक १० रोजी पोस्ट ऑफिस बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या राखी सणाच्या काळात टपाल कार्यालय बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. भारतीय टपाल कार्यालयाचे खाजगीकरण करण्याच्या सरकारच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता, टपाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेला सरकारला इशारा देण्यासाठी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. आणि हे पाहता अखिल भारतीय पोस्ट ऑफिस बंद असल्याची बाब समोर आली. भद्रावती पोस्ट ऑफिससमोर आलेल्या सर्व लोकांना पोस्ट ऑफिस का बंद आहे हे समजू शकले नाही. कारण पोस्ट ऑफिसजवळ ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे पोस्टर चिकटवण्यात आले होते. या सणासुदीच्या दिवशी पोस्ट ऑफिस का बंद असते हे लोकांना समजू शकले नाही. हे पोस्ट ऑफिसच्या लोकांचे काम होते, त्यांनी किमान पोस्ट ऑफिससमोर या प्रकरणाची माहिती देण्यासाठी तेथे कोणत्याही प्रकारची माहिती लिहिली नाही. भद्रावती पोस्ट ऑफिसच्या कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही तिथे एक छोटासा फलक लावला होता, मात्र तो पावसामुळे काढला गेला असावा. पण लोकांच्या माहितीसाठी आम्ही ते फलकावर लावले आहे.

Comments