वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

‘पुढे कसे होईल?’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला रवींद्र शिंदे यांचे अध्यक्षपद

पुढे कसे होईल?’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला रवींद्र शिंदे यांचे अध्यक्षपद

बातमी: चंद्रपूर ५/४/२०२६

चंद्रपूर येथील मा. सा. कन्नमवार सभागृहात ‘पुढे कसे होईल?’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान व स्तंभ पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभवली.

सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ शेतकरी नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रसिद्ध समीक्षक डॉ. नरेंद्र आरेकर यांनी संग्रहातील कवितांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्रा. डॉ. राजकुमार मुसने, प्रा. डॉ. ज्योत्स्ना मोहितकर व किशोर मुघल या दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीने सोहळा संपन्न झाला. कवी शंकर लोडे यांच्या लेखणीतून उतरलेला हा काव्यसंग्रह समाजातील विविध पैलूंवर मार्मिक भाष्य करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

दुसऱ्या सत्रातील कविसंमेलनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे विचारांची देवाणघेवाण होऊन समाजाला नवी दिशा मिळते, असे प्रतिपादन रवींद्र शिंदे यांनी केले. आयोजक प्रा. रत्नाकर चटप व संपूर्ण टीमचे त्यांनी आभार मानले.

Comments